Blogroll

बोईंग विमानाचे जास्त अपघात का होतात, महत्वाचा खुलासा समोर!

अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच 'एअर इंडिया' चे एआय १७१ विमान कोसळले. प्राथमिक तपासात विमानाच्या सेटिंग्ज आणि शेवटच्या क्षणी तांत्रिक बिघाडांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनरचे लॅण्डिंग गियर बाहेर राहिले आणि उड्डाण करताना विंग फ्लॅप्स पूर्णपणे बंद असल्याचे उघड झाले आहे. जगात बोईंग विमानाचे आतापर्यंत सहा हजार अपघात झाले असून त्यात नऊ हजार जणांचे बळी गेले आहेत. बोईंग विमानाचे अपघात का होतात आणि अहमदाबादच्या विमान अपघाताचे कारण याचा खोलात जाऊन शोध घ्यावा लागेल.


अ हमदाबाद विमानतळावरून 'एअर इंडिया'च्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणात ते कोसळले. इतक्या अल्पावधीत काय झाले असेल की. विमान कोसळून त्यात २६५ जणांचा बळी गेला. सामान्यतः बोईंग ७८७ च्या नियमांनुसार उड्डाणासाठी फ्लॅप्स पाच किंवा त्याहून अधिक वर सेट करणे आवश्यक असते आणि जेव्हा विमान वेगाने उंची वाढवते, तेव्हा ते हळूहळू बंद केले जातात. उड्डाणानंतर काही सेकंदांनी लॅण्डिंग गियर बंद केले जातात. त्यानंतरच विमान योग्यरीत्या उड्डाण सुरू करते. समोर आलेल्या व्हिडीओ-फोटोवरून असे दिसून येते की, पायलटने लॅण्डिंग गियर थोडा बंद करण्याचा प्रयत्न केलाः परंतु लगेचच तो पुन्हा बाहेर काढला. कदाचित त्याला वाटले असेल की, विमानाची शक्ती किंवा जोर कमी होत आहे. उड्डाणानंतर लगेचच विमानाची शक्ती गेली असण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की, काही यांत्रिक किंवा हायड्रॉलिक बिघाडामुळे लॅण्डिंग गियर खाली अडकला असेल. अशा परिस्थितीत, पायलटने हवेचा प्रतिकार कमी करण्यासाठी आणि वेग वाढविण्यासाठी फ्लॅप्स लवकर बंद केले असतील. कारण गियर आणि फ्लॅप्स दोन्ही बाहेर पडल्याने खूप प्रतिकार होतो. त्यामुळे विमानाला उंच जाणे कठीण होतेः परंतु कमी उंचीवर आणि कमी वेगाने फ्लॅप्स लवकर बंद करणे खूप धोकादायक आहे. कारण ते विमान उचलणारी शक्ती (लिफ्ट) कमी करते आणि विमान कॅप्टन भास्कर निघूट वायुदलातील निवृत्त अधिकारी थांबण्याचा धोका वाढवते. विमान जास्त हललेले दिसत नव्हते. याचा अर्थ वैमानिकांचे नियंत्रण होते. उजवा रडार वापरला गेला होता. त्यामुळे डाव्या इंजिनमध्ये बिघाड झालेला असू शकतो, असेही सांगितले गेले; परंतु त्यामुळे विमान कोसळण्याचे कारण स्पष्ट होत नाही. ६०० फूट उंचीवर गियर आणि फ्लॅप्स बंद करणे हे खूप चुकीचे आहे. हे कदाचित तांत्रिक बिघाडांमुळे किंवा वैमानिकांच्या आपत्कालीन प्रयत्नांमुळे घडले असेल. अखेर विमानाची उंची कमी झाली आणि ते थांबले. कारण लिफ्ट कमी होती आणि प्रतिकार जास्त होता. यामुळे टक्कर होण्यापूर्वी वैमानिक विमान वाचवू शकले नाहीत. आता पुढील चौकशी केली जाईल. फ्लाईट डेटा आणि कॉकपिट रेकॉर्डिंगच्या तपासणीत या चुकांकडे अधिक लक्ष दिले जाईल. अहमदाबादमध्ये 'एअर इंडिया'चा ज्या विमानाचा अपघात झाला, ते बोईंगचे ७८७ड्रीमलाईनर होते. त्याचे आतापर्यंत फार अपघात झाले नाहीत.

बोईंग विमाने कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही बोईंग विमाने अनेक वेळा कोसळली आहेत. २०२४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोईंगचे एक विमान कोसळले होते. त्यात सुमारे १८० जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बोईंगचे ७३७-८०० विमान होते. ते आता ७३७ मॅक्सची नवीन आवृत्ती आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, एका वेगळ्या घटनेत उड्डाणादरम्यान ७३७मॅक्सच्या दरवाजाचा प्लग उडाला. याशिवाय २०१८ आणि २०१९ मध्ये बोईंग ७३७ मॅक्स विमाने कोसळली. त्यात लायन एअर फ्लाईट ६१० आणि इथिओपियन एअरलाईन्स फ्लाईट ३०२ यांचा समावेश आहे. त्यामुळे विमान थांबवावे लागले आणि कंपनीला ३० अब्ज डॉलर्सपर्यंतचे नुकसान झाले. २०१८ आणि २०१९ च्या अपघातांमध्ये १८९ आणि १५७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तथापि, ते

अजूनही बोईंग ७३७-८०० सह कार्यरत आहे. जेव्हा बोईंग विमाने सतत अपघात होत होती, तेव्हा बोईंग ७३७ मॅक्सची चौकशी करण्यात आली. तपासणीत 'मॅन्युव्हरिंग कॅरेक्टरिक्स ऑगमेंटेशन सिस्टम' (एमसीएएस) शी संबंधित समस्या उघडकीस आली. आली. या प्रणालीमुळे मॅन्युअल लॅण्डिंगवरील अवलंबित्व कमी झाले होतेः परंतु वैमानिकांना त्याबद्दल फारशी माहिती देण्यात आली नव्हती. २०१८ आणि २०१९ मध्ये ३४६ प्रवासी आणि क्रू सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर या विमानाचे ऑपरेशन थांबवण्यात आले. नंतर ते अपडेट करण्यात आले आणि बोईंग ७३७-८०० या नावाने कार्यान्वित करण्यात आले. बोईंगच्या ७८७ ड्रीमलाईनरला यापूर्वी कधीही अपघात झाला नव्हता. बोईंग विमानांबद्दल आधीच अलर्ट आले होते. या अपघातामुळे पुन्हा ७८७ च्या सुरक्षिततेबद्दल कठीण प्रश्न निर्माण झाले आहेत. या विमानाबद्दल वर्षानुवर्षे इशारे दिले जात होते. ७८७ च्या 'फ्यूजलेज'चे काही भाग योग्यरीत्या जोडले गेले नव्हते. त्यामुळे विमानाच्या संरचनेला धोका निर्माण झाला होता. बोईंग पार्टनर सुविधेतील मेकॅनिक रिचर्ड क्युवास यांनी २०२३ मध्ये 'निकृष्ट उत्पादन' झाल्याचे म्हटल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन' (एफएए) या दाव्यांची सक्रियपणे चौकशी करत आहे. 'बोईंग'ने जाणूनबुजून सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा इन्कार केला. ७८७ सुरक्षित असल्याचे सांगितले आणि टिकाऊपणा किंवा दीर्घायुष्याला कोणताही तत्काळ धोका नसल्याचे म्हटले. तथापि, आता या मोठ्या अपघातानंतर बोईंग पुन्हा एकदा चौकशीच्या कक्षेत आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बोईंग विमानांना जगभरात सुमारे सहा हजार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४१५ प्राणघातक होते. अपघातात नऊ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. 


जगभरात उड्डाण करणाऱ्या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान चार हजारांहून अधिक विमाने बोईंग ७३७-८०० ची आहेत. न्यू यॉर्क टाईम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका हे काही प्रमुख खंड आहेत, जिथे बोईंग विमाने वापरली जातात. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. त्यात अनेकांचा बळी गेला. हा अपघात गेल्या दशकातील जगातील सर्वात मोठा विमान अपघात ठरला आहे. अपघातानंतर विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या महत्त्वाच्या डेटाचे पूर्णपणे डीकोड आणि विश्लेषण करण्यासाठी अनेक आठवडे ते अनेक महिने लागू शकतात. बोईंग ७८७ ड्रीमलाईनरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विमानात एवढ्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान २०११ पासून व्यावसायिक सेवांमध्ये आहे आणि आजपर्यंत सर्वात सुरक्षित विमानांमध्ये त्याची गणना केली जाते. त्यामुळे अहमदाबादच्या अपघाताबाबत 'ब्लॅक बॉक्स'च्या विश्लेषणातून काय माहिती मिळते, त्यातून अपघाताचे खरे कारण समजू शकेल. 'ब्लॅक बॉक्स मध्ये दोन केशरी रंगाची उपकरणे असतात. पहिले म्हणजे 'फ्लाईट डेटा रेकॉर्डर' (एफडीआर). ते विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटने केलेल्या प्रत्येक तांत्रिक कृतीची नोंद करते. दुसरे म्हणजे 'कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर' (सीव्हीआर). ते वैमानिकांचे संभाषण, कंट्रोल टॉवरशी रेडिओ संपर्क आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड करते. अमेरिकन संघटना 'नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड' (एनटीएसबी) नुसार, 'ब्लॅक बॉक्स'मध्ये २५ तासांपर्यंतच्या सतत उड्डाणाची

माहिती रेकॉर्ड केली जाते. अहमदाबाद अपघातात ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. त्यातून अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, पायलटची चूक किंवा इतर काही कारण होते की नाही हे कळेल. तज्ज्ञांच्या मते, 'टेक ऑफ'नंतर लगेच उंची वाढवणे आणि आपत्कालीन कॉल पाठवणे अशा परिस्थितीत, इंजिनच्या कामगिरीची आणि इशारा सिग्नलची माहिती 'एफडीआर' कडून उपलब्ध होईल, तर 'सीव्हीआर' त्या क्षणी वैमानिकांनी केलेले प्रयत्न आणि संवाद उघड करेल. 'ब्लॅक बॉक्स' मिळाल्यानंतर तो 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो ऑफ इंडिया' (एएआयबी) किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवला जातो. जर उपकरण खराब झाले, तर त्यातील मेमरी काढून दुसऱ्या सिस्टिममध्ये ट्रान्सप्लांट केली जाते. तपास प्रक्रियेत फ्लाईट डेटा आणि ऑडिओ एका शेअर केलेल्या टाईमलाईनवर एकत्र करणे आणि त्याची तुलना एअर ट्रॅफिक कंट्रोल रेकॉर्ड आणि रडार डेटाशी करणे समाविष्ट आहे. तपासकर्ते आता विमानाच्या अंतिम उड्डाणाचे दृश्यमानपणे पुनरुज्जीवन करण्यासाठी 'थ्री डी सिम्युलेशन' देखील तयार करू शकतात. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएक्यू) नियमांनुसार, प्राथमिक अहवाल तीस दिवसांच्या आत जारी करावा लागतोः परंतु संपूर्ण अहवाल तयार होण्यास १२ ते २४ महिने लागू शकतात. 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन' नुसार आधुनिक विमाने दर सेकंदाला हजारो डेटा पॉईंट्स तयार करतात. त्यांचे विश्लेषण अतिशय बारकाईने करावे लागते. बोईंग ७८७ड्रीमलाईनरचा हा पहिला मोठा अपघात असल्याने त्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.


चायनीस खाताय? अजिनोमोटोचे दुष्परिणाम जाणून घ्या!

 Chinese food bad effects of ajinomoto - मुंबई व पुण्याबरोबरच छोट्या शहरांमध्येही चायनीज खाद्यपदार्थ खवय्यांसाठी सहज उपलब्ध होतात. चायनीज भेळपासून तर मन्चुरियन, राइस सर्वच पदार्थ तरुणांच्या आवडीचे बनले आहेत. मात्र, या पदार्थामध्ये वापरण्यात येणारा अजिनोमोटो क्वचितप्रसंगी अगदी कमी प्रमाणात खाण्यात गेला, तर फारसा हानिकारक ठरत नाही; मात्र अधिक प्रमाणात याचे सेवन करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच मानसिक आरोग्य व झोपेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.



अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळेच रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी ते पदार्थ खाऊ नये. अजिनोमोटोचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. पॅकिंग फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमची जाडी वाढू शकते. लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

अजिनोमोटो आणि असे बाकीचे फ्लेवरचे पदार्थ टाळण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे घरचे जेवण घेणे. रेस्टॉरंटमध्ये कधीतरी जाऊन खाणे ठिक. मात्र, त्याला मर्यादा असावी.

या पदार्थांमध्येही असते अजिनोमोटो

केवळ चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो असते, असे नाही. अनेक पॅक फूड उत्पादनांमध्येही अजिनोमोटोचा वापर करण्यात येतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, दोन मिनिटांत बनणारी सूप, मॅजिक मसाले, चिप्स अशा अनेक गोष्टींमध्ये अजिनोमोटो असते. तसेच फ्लेव्हरसाठीही त्याचा वापर केलेला असतो.

धनत्रयोदशी कथा

धनत्रयोदशी कथा


धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.

तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

    आश्विन कृष्ण त्रयोदशी - दिवाळीचा पहिला दिवस - हिंदूधर्मातील सण आणि उत्सव

रंग बदलणारे रत्न अँलेक्झांड्राइट

 रंग बदलणारे रत्न अँलेक्झांड्राइट

Alexandrite Color Changing

दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशात एक रंग व रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात दुसराच रंग दाखवणारे खनिज हा निसर्गात सापडणारा एक दुर्मिळ प्रकार आहे. मात्र यात मोठय़ा आकाराचे खडे क्वचितच सापडतात. र्ण वैडूर्य (क्रायसोबेरिल) या खनिजाचे विशेष प्रकाशीय आविष्कार दाखवणारे दोन अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे नवरत्नात अंतर्भाव असलेला लसण्या (Cat"s eye) जो "Chatoyancy" हा प्रकाश आविष्कार दाखवितो (त्याची माहिती दिलेलीच आहे). दुसरा आहे अँलेक्झांड्राइट, ज्यात नैसर्गिक प्रकाशातील खनिजांचा रंग व कृत्रिम प्रकाशातील खनिजाचा रंग यात फरक असतो.
अलीकडच्या काळातील शोध
या रत्नाबद्दल प्राचीन इतिहास तसेच कोणत्याही दंतकथा उपलब्ध नाहीत. कारण याचा शोधच मुळी १९व्या शतकात लागला. या शोधाची कथा मात्र फारच मनोरंजक आहे. सन १८३0मध्ये रशियातील उरल पर्वतराजीतील एमएल खाणीत नेहमीप्रमाणे कामगार पाचू गोळा करीत होते. एका कामगाराने एके दिवशी गोळा केलेले पाचू आपल्या वस्तीवर नेले. रात्री वस्तीत पेटवलेल्या शेकोटीच्या प्रकाशात कामगारांच्या लक्षात आले, की हे खडे लाल रंगाचे दिसत होते. त्यामुळे सर्वच कामगार अचंबित झाले. परत सकाळी उजाडल्यावर कामगारांच्या लक्षात आले की रात्री शेकोटीच्या प्रकाशात लाल दिसणारे खडे सकाळच्या सूर्यप्रकाशात परत हिरवे दिसत होते. कामगारांना समजले, की आपल्याला एक नवीन, दुबरेध असा खनिजाचा प्रकार सापडला आहे.
रशियाचे राष्ट्रीय खनिज
सन १८४२मध्ये खनिजशास्त्रज्ञ नार्डेनस्काओल याने अँलेक्झांडर दुसरा, जो पुढे रशियाचा झार बनला, त्याच्या गौरवार्थ या नवीन खनिजाला अँलेक्झांड्राइट (Alexandrite) असे नाव दिले. या खनिजाचा दिवसा दिसणारा हिरवा रंग व कृत्रिम प्रकाशात दिसणारा लाल रंग यांचे रशियन राजघराण्याच्या ध्वजावरील रंगाशी साम्य असल्याने अँलेक्झांड्राइट हे राष्ट्रीय खनिज बनले. रासायनिकदृष्ट्या यात बेरिलिअम अँल्युमिनिअम ऑक्साइड व अल्पप्रमाणात क्रोमिअम असते. हे अल्पप्रमाणातील क्रोमिअमच त्याच्या रंगास कारणीभूत असते. याचे स्फटिक समचतुभरूज प्रणालीचे असतात व याचा काठिण्य क्रमांक ८.५ आहे. अँलेक्झांड्राइटचे विशिष्ट गुरुत्व ३.८ व वक्रीभवनांक १.७५ आहे.
रंग बदलाच्या तीव्रतेवर किंमत
याची प्रत किंवा किंमत ठरवताना याच्यातील रंग बदलाच्या तीव्रतेचा (Intensity) विचार केला जातो. या रंग बदलाला 'अँलेक्झांड्राइट परिणाम' असे म्हणतात. हा परिणाम जास्त प्रभावी दिसण्यासाठी या खनिजाचा तुकडा योग्य जाडीचा कापणे आवश्यक असते. अँलेक्झांड्राइटचे पाच कॅरटपेक्षा जास्त वजनाचे फारच थोडे खडे निसर्गात आढळतात. त्यामुळेच दागिन्यात या रत्नाचा वापर फार क्वचितच आढळतो. सुरुवातीला फक्त रशियातच आढळणारे हे रत्न नंतर ब्राझील, टांझानिया, श्रीलंका, भारत या देशांतही आढळले. आपल्या देशात केरळ, तमिळनाडू, ओरिसा, छत्तीसगड या राज्यांत हे रत्न आढळते. जगात अतिपूर्वेकडील देशांत या रत्नाला फार मागणी आहे.

देखणे नारंगी पोवळे

 देखणे नारंगी पोवळे

समुद्र म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा फार मोठा खजिनाच आहे. काही समुद्री प्राण्यांच्या स्रावापासून पोवळ्यासारखे रत्न तयार होते. अशी काही प्राणिज रत्ने सापडत असल्यामुळेच समुद्राला 'रत्नाकर'ही म्हणत असावेत. वरत्नातील प्रवाळ हे रत्न मोत्याप्रमाणेच सागरी प्राण्यांच्या जीवनप्रक्रियेतून तयार होणारे प्राणिज वर्गातील रत्न आहे. प्रवाळ, पोवळे, पवलम, मंगळ, मुंगा किंवा इंग्रजीत या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रत्नाचा काठिण्य क्रमांक ३ ते ३.५ आहे. विशिष्ट गुरुत्व २.६ असून, वक्रीभवनांक १.५५ असतो. रासायनिकदृष्ट्या पोवळ्यात मुख्यत: कॅल्शियम काबरेनेट, तसेच अल्प प्रमाणात लोह किंवा मॅग्नेशियम असते. या अल्प प्रमाणातील लोह किंवा मॅग्नेशियममुळेच प्रवाळांना तांबडा, नारिंगी, काळा असे वेगवेगळे रंग येतात. तसे बघायला गेले तर प्रवाळ हे एक नाजूक, नरम व रासायनिक परिणाम सहज होणारे प्राणिजरत्न आहे. पण मोहक लाल, नारिंगी रंग व त्याला असलेली झिलई  घेण्याची क्षमता या त्याच्या अंगच्या गुणांमुळेच त्याचा अंतर्भाव रत्नात केलेला आहे.
उबदार हवामानात, उथळ सागरी पाण्यात वाढणार्‍या सीलेंटेरेटा या प्राणिसंघातील, मुख्यत: अँथोझोआ या वर्गातील प्राण्यांनी स्वत:भोवती स्रवलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले साठे म्हणजे प्रवाळ. काही वेळा समुद्रात प्रवाळांच्या प्रचंड आकारमानाच्या भित्ती किंवा खडक तयार होतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ. प्रवाळ भित्तीच्या परिसरातील समुद्रात विपुल जैवविविधता आढळते व त्यामुळेच आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा असतो. इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, फिलिपाइन्स येथे उच्चप्रतीचे पोवळे मिळते. भारतात मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात पोवळी आढळतात.
रंग, चमक, घट्टपणा, भरीवपणा इत्यादी गुणांवर पोवळ्याची किंमत अवलंबून असते. तांबड्या रंगाचे पोवळे सगळ्यात महाग असते. पोवळ्यावर कोणताही रंग चढवला जाऊ शकतो, पण अँसिटोनमध्ये बुडवलेला कापूस त्यावर घासल्यास रंग कापसावर लागतो. निकृष्ट पोवळ्याची भुकटी करून त्यापासून मूर्ती बनवतात. प्रवाळाचे मणी बनवून माळा तयार करतात. प्लॅस्टिक, काच, पोर्सेलिन इत्यादी पदार्थापासून प्रवाळाच्या अनुकृतीही बनवल्या जातात.
काष्ठसदृश रचना व पृष्ठभागावर बारीक सुतासारख्या रेषा ही प्रवाळ ओळखण्याची महत्त्वाची खूण आहे. प्रवाळापासून केलेल्या प्रवाळभस्माचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत.
जगात प्रवाळांच्या ८00पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी २५0 पेक्षा जास्त जाती भारतात आढळतात. या मुख्यत: अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात तर थोड्या प्रमाणात लक्षद्वीप, मन्नारचे आखात व कच्छचे आखात या भागात सापडतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांत या प्रवाळांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धोक्याबद्दल तसेच प्रवाळांचे आर्थिक व परिसरीय महत्त्व याबद्दल समाजात जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.

जगातील पहिले छायाचित्र

 जगातील पहिले छायाचित्र


छायाचित्र कलेचा इतिहास तसा फार प्राचीन नाही. औद्योगिक क्रांतीबरोबरच ही कला विकसित होत गेली. सर्वच क्षेत्रांना त्याचा फार चांगला उपयोग झाला. विज्ञानक्षेत्रही याला अपवाद नव्हते. विज्ञानाशी संबंधित अशा काही छायाचित्रांची ओळख करून देणारे नवे सदर. ळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इटलीतील पीसा शहरातील फ्रायर लोक काच बनवण्याच्या कलेत निपुण झाले होते. फ्रायर हे ख्रिश्‍चन भिक्षुक. त्यांनी काचेची पारदर्शक गोलाकार अशी एक वस्तू तयार केली की जिचा मध्यभाग जरा जास्त फुगीर होता. अगदी मसूरच्या दाण्यासारखा. यातून बघितल्यावर आपल्याला जवळची वस्तू मोठी दिसते. मसूरला लेंटिल म्हणतात आणि त्यावरून या वस्तूला लेन्स म्हणण्यात येऊ लागलं.
या एका भिंगाने आपले जीवनच पलटून टाकले. ठराविक वयानंतर ज्यांना लहान अक्षरं वाचणं जमत नव्हतं ते आता या भिंगाच्या मदतीने वाचू शकत होते. मुख्य म्हणजे जे नुसत्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही तेही आपण बघू लागलो. दुर्बिणीच्या माध्यमातून खूप दूरच्या गोष्टी, तर सूक्ष्मदश्रीच्या माध्यमातून खूप लहान गोष्टी बघणं शक्य झालं. त्यानंतरचा मोठा शोध म्हणजे छायाचित्रणाचा - जे फक्त आपल्यालाच दिसू शकतं, ते आता इतरांनाही दाखवणं शक्य झालं होतं. छायाचित्रणकलेच्या या शोधाने क्रांतीच केली. त्यातील अगदी सुरुवातीची छायाचित्र आजही पाहण्यासारखी आहेत. म्हणूनच यापुढे आपण विज्ञानाशी निगडित अशा काही नैसर्गिक सौंदर्यांच्या आविष्कारांची माहिती घेऊया. आजचं हे छायाचित्र आहे रासायनिक प्रक्रियेतून निसर्गाचं सौंदर्य कैद करणारं. फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोअर निप्स यांनी सन १८२६-१८२७ या दरम्यान ते घेतलं होतं. या चित्राला शीर्षक होते 'व्ह्यू फ्रॉम द विंडो एट ले ग्रास.' आपल्या घराच्या एका खिडकीतून त्यांनी हे छायाचित्र घेतलं. हे चित्र घेण्यास त्याला काही तास लागले होते.
त्या वेळी या प्रक्रियेला लाईट पेंटिंग म्हणत असत. त्याला फोटोग्राफी नाव दिलं जॉन हश्रेल यांनी. (युरेनसचा शोध लावणारे विल्यम हश्रेलचे सुपुत्र). फोटोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे - फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे आलेख. आपल्याकडे या प्रक्रियेला छायाचित्रण असे नाव रुजू झाले. पण, काहींचे म्हणणे होते, की याला प्रकाशचित्रण म्हणायला पाहिजे.

शुभ्रधवल देवमासा

 शुभ्रधवल देवमासा | White Whale

देवमाशांच्या जाती, उपजातींचे सातत्याने निरीक्षण आणि नोंदणी करण्यात येते. अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागातील नॅशनल अक्वेरिअमचे संचालक डॉ. स्कॉट क्रॉस यांनी देवमाशांवर (व्हेल्स) प्रचंड संशोधन केले आहे. त्यांना सन २000 मध्ये जॉजिर्या आणि फ्लोरिडा प्रांताच्या किनारपट्ट्यांजवळील सागरी प्रदेशात संपूर्णपणे शुभ्रधवल रंगांच्या जन्म घेतलेल्या पिल्लांची माहिती मिळाली. देवमाशाचे मांस रुचकर आणि त्यांच्या शरीरातील तेल (चरबी) उपयुक्त असल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणावर शिकार केली जाते. ल ऊर्फ देवमासा म्हणजे जलचर प्राण्यांमधील महाकाय भव्य प्राणी. देवमाशांच्या अनेक जाती, उपजाती आहेत. सरासरीने प्रत्येक प्रौढ देवमाशाचे वजन एक ते दीड टन, लांबी पंधरा ते वीस फूट असते. पसरट, शक्तिवान शेपटीमध्ये जबरदस्त ताकद असते. शेपटीच्या तडाख्याने लहान, मध्यम बोटी उलट्यापालट्या होतात. ही उपजात अगदी नाश होण्याच्या टप्प्यात आहे. १९९0 नंतर प्रथमच 'नॉदर्न राईट व्हेल' आढळून आले. सर्व व्हेल जातींच्या माशांचा रंग काळसर, राखाडी असतो.
व्हे या माशांना शास्त्रीय भाषेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशांना शास्त्रीय भाशेत 'नॉदर्न राईट व्हेल्स' नावाने संबोधण्यात येते. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. या माशाच्या अस्थींपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात.