Blogroll

डीएनए तंत्र

डीएनए तंत्र 

डॉ. रिसी यांनी २00३ मध्ये 'मायक्रोअँरे' या डीएनए तंत्राने सार्स विषाणूची निदान चाचणी प्रचारात आणली. त्या तुलनेत आताच्या आधुनिक चाचणीत अधिक सर्वसमावेशकता आहे. यात संसर्गाच्या डीएनएच्या उपप्रकारांची छाननीपण आहे. या तंत्रामुळे संसर्गाची नवी साथ आल्यास तिचा उगम शोधणे सोपे होणार आहे. डीएनए निदान तंत्राची पार्श्‍वभूमी तशी दहा वर्षांची आहे. डॉ. द रिसी या कॅलिफोर्निया विद्यापीठातीलच जैवशास्त्रज्ञाने हे तंत्र विकसित करायचे ठरवले. त्याला डॉक्टर विल्सन या चेताशास्त्रज्ञाने (न्यूरॉलॉजिस्ट) आणि डॉ. चिऊ या संगणकतज्ज्ञाने सहकार्य दिले. सूक्ष्मजंतूंबाबत जगभरात सतत संशोधन सुरू असते. बर्‍याच आजारांचे मूळ सूक्ष्मजंतूकडून होणार्‍या प्रादुर्भावात आहे; मात्र ते लवकर समजत नाही. आजार कोणत्या जंतूमुळे झाला, ते शोधून काढणारी एक नवी प्रणाली आता शास्त्रज्ञांनी शोधली आहे. द्यकीय क्षेत्रात निदानाला मोठे महत्त्व आहे. ते व्यवस्थित झाले, की उपचाराची निश्‍चिती करता येते; पण तेच अनिश्‍चित असेल, तर लक्षणानुसार उपचार सुरू करून सुधारणेची वाट पाहावी लागते. मेंदूज्वरासारख्या व्याधीत तापाबरोबर मेंदूलाही सूज आलेली असल्याने निदानात गफलत झाल्यास रुग्णाला ते प्राणघातक ठरू शकते. या व्याधीचे लवकर व अचूक निदान व्हावे, म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी डीएनए क्रमावर आधारित एक चाचणी नुकतीच विकसित केली आहे. तिच्या मदतीने मेंदूज्वराच्या संसर्गाचा उगम कशात आहे, उदाहरणार्थ, तो विषाणूत आहे का बॅक्टेरियात, का कुठल्या परजीवी जंतूत (पॅरासाइट) आहे, याची शहानिशा प्रथम होते. त्यानंतर विशिष्ट संसर्गाच्या उपप्रकाराची निश्‍चिती होते.
आपल्या शरीरातील रक्तात किंवा मज्जाद्रवात चयापचयाने तयार झालेल्या डीएनए तुकड्यांचे मिश्रण असते. अगदी लाखोंच्या संख्येत ते असतात. काही तुकडे शरीराच्या डीएनएचे, तर काही सूक्ष्मजंतूच्या डीएनएचे! वरच्या चाचणीत शरीरातील डीएनए तुकड्यांना संसर्गाच्या डीएनए तुकड्यांपासून वेगळे करून मग खास संसर्गाच्या डीएनए तुकड्यांची छाननी करण्याचे काम होते. आपण म्हणतो त्याप्रमाणे गवताच्या गंजीतून एखादी सुई शोधण्याइतके ते जटिल आहे. साधारणपणे तीस लाखांपर्यंत डीएनए तुकड्यांचे याप्रमाणे वर्गीकरण होते! सूक्ष्मजंतूंच्या डीएनए तुकड्यांची विविध संसर्ग डीएनए तुकड्यांच्या संग्रहातून जुळणी करून मग संसर्ग करणारा सूक्ष्मजंतू नक्की कोणता, हेही स्पष्ट होते.

संगणक आणि संस्कृती

 संगणक आणि संस्कृती

आइबेलोच्या अभ्यासगटाने यासाठी 'फ्लिकर' आणि 'अनोबिली' या दोन नेटवर्कवरील दीड लाख जोड्यांनी एकमेकांना पाठविलेल्या संदेशांचा अभ्यास केला. हे दहा लाखांपेक्षाही जास्त संदेश निवडून त्यांची विभागणी वर उल्लेखलेल्या तीन गटांमध्ये करण्याकरिता त्यांनी एका खास तयार केलेल्या 'अल्गोरिदम'चा (पदावली) वापर केला. त्याचबरोबर या संदेशांमधील एक हजार संदेश यादृच्छिक पद्धतीने (रँडम सँपलिंग) निवडून त्यांची विभागणी वरील तीन गटांमध्ये करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचेही साह्य घेतले.
आइबेलोंच्या दाव्यानुसार या दोन्ही पद्धतीने काढलेल्या निष्कर्षांमध्ये आश्‍चर्यकारक साम्य आहे. एवढेच नव्हे तर मानवी परस्पर संबंध आणि एकंदरीतच सामाजिक धारणेच्या सखोल अभ्यासासाठी कितीतरी नवे दुवे त्यामधून दिसून येतात. किंबहुना त्यांच्या मते हे विश्लेषण म्हणजे समाजाचे, समाजसंबंधाचे एक प्रकारचे नवे 'व्याकरण'च ठरू शकेल.. आणि मग संगणक तुमच्या-आमच्या आणि सर्वच समाजाच्या संबंधांचा 'कार्यकारणभाव' सांगू शकेल!

हे या बंध किंवा अणूंची विभागणी तीन प्रकारांमध्ये करता येते.
सामाजिक दर्जाविषयक बंध, सामाजिक पाठिंबा आणि माहितीची देवाण-घेवाण. बंध : सोशल नेटवर्कचे 'अणू'
आइबेलो यांच्या अभ्यासगटाचा दावा हा काही विशिष्ट निकष व गृहितांवर आधारित आहे. सोशल नेटवर्कमध्ये सहभागी होणार्‍या कोणत्याही दोघा व्यक्तींमधील संबंध हे एकाने दुसर्‍यास पाठविलेला संदेश किंवा एखाद्याने दुसर्‍याचा घेतलेला मागोवा अथवा एखाद्याने दुसर्‍याविषयी दाखविलेला लोभ, स्नेह इत्यादी किंवा अशा स्वरूपात असतात. दोन व्यक्तींमधील हे 'बंध' म्हणजेच सोशल नेटवर्क सामाजिक साखळीचे मूलभूत घटक अथवा 'अणू' सारखे मानता येतील. माणसांचे परस्परसंबंध हा कोणत्याही नियमांमध्ये बसू न शकणारा गहन, अथांग आणि क्लिष्ट विषय आहे. त्यामुळेच त्याला संगणकांच्या चौकटीमध्ये बांधता येणार नाही, असा समाजशास्त्रज्ञांचा दावा होता. नेमकी हीच बाब खोडून काढून मानवी आचार-विचार व संस्कृती यांना संगणकशास्त्रामध्ये बद्ध करणाच्या प्रयत्नात 'याहू' या विश्‍वविख्यात संगणकीय संस्थेमधील संशोधक आहेत आणि त्यांना त्यामध्ये बर्‍यापैकी यशसुद्धा मिळते आहे. 'याहू'मधील शास्त्रज्ञांचे यश
संगणक, इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाला 'याहू' हे संकेतस्थळ माहीत आहे. ई-मेलपासून बाजारभावापर्यंत आणि क्रीडाजगतापासून 'गॉसिप' गप्पांपर्यंत सार्‍या संगणकविश्‍वावर 'याहू'चा कब्जा आहे. इंटरनेट सेवा, सोशल मीडिया, नेटवर्किंग यांचा पसारा वाढवतानाच अधिकाधिक ग्राहक आपल्या 'जाळ्यामध्ये' कसे पकडता येतील, याच्या शास्त्रोक्त संशोधनामध्ये 'याहू'मधील तज्ज्ञ संशोधक अहोरात्र गढलेले असतात.
स्पेनमधील बर्सिलोना येथील 'याहू' प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ लुका मारिया आइबेलो व त्यांच्या संशोधनगटाने समाजघटकांच्या म्हणजेच माणसांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास सोशल मीडियाच्या संदर्भात केला आहे आणि त्यांच्या मते मानवी संबंध आणि संस्कृती यांच्याबाबतीमधील अनेक रहस्यांची उकल या परस्पर संपर्काच्या खोल अभ्यासाने करता येते.
ण्य नवाचे व्यवहार आणि सांस्कृतिक विनिमय हे घटकही संगणकशास्त्राच्या अखत्यारीमध्ये आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न हे संगणकाच्या शोधाइतकेच जुने आहेत. माणसांचे विचार, भावना, रागलोभादी विकार आणि त्या सर्वांचा कार्यकारणभाव म्हणजेच थोडक्यात मानवी मन व बुद्धी यांचा संगणकाद्वारे अभ्यास व अंदाज घेण्याच्या संशोधनावर मायक्रोसॉफ्टपासून आयबीएमपर्यंत जगातील सर्व अग्रगण्य कंपन्या तसेच विद्यापीठांमध्ये काम चालू आहे.
'इंटरनेट' म्हणजेच संगणकविश्‍वातील महाजालामधील फेसबुक, व्हॉट्सअँप, लिंक्ड-इन, ट्विटर या आणि अशासारख्या अनेक 'सोशल नेटवर्क'वर दररोज होत असलेल्या कोट्यवधी संदेशांच्या देवाण-घेवाणीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासामधून मानवी परस्परसंबंधांच्या गूढ विश्‍वाची उकल मोठय़ा प्रमाणामध्ये व प्रभावीपणे करता येऊ शकेल, असा या क्षेत्रांत काम करणार्‍या संगणकतज्ज्ञांचा विश्‍वास आहे.

कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे

कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे


कासवासारख्या प्राण्यातही बुद्धिमत्ता आहे. प्रयोगाअंती ते सिद्धही झालं आहे. पाळण्याकरिता व खाण्याकरिताही होत असलेल्या त्यांच्या वापरावर निर्बंध घालण्याची गरज आहे.
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉबेरीचं. ती शिक्षित झाली का हे पाहण्यासाठीच्या काही कसोट्या होत्या. तरंगताना योग्य दिशा शोधणे, टच स्क्रिनपर्यंतचं अंतर कापणे, त्याला लागणारा वेळ, यशस्वीपणे टच स्क्रीनला केलेला स्पर्श व त्याची मोजदाद. कासवं शिकली. त्यासाठी कासवांच्या मेंदूतील ं१्रं'>टी्िरं' उ१३ी७/ं१्रं'> हा भाग उद्दिपीत झाल्याचा निष्कर्ष निघाला. पक्षी, कुत्रा वगैरे प्राण्यांच्या मेंदूचा ं१्रं'>्रस्रस्रूेंस्र४२ /ं१्रं'>भाग उद्दिपीत होतो; पण तो कासवात नसतोच.
ही रेड फुटेड प्रायोगिक कासवं होती मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या नदी खोर्‍यातली. मध्यम आकाराची ही कासवं वजनाने २८ किलो आणि शरीराच्या लांबीत ३0 ते ४0 सें.मी. भरतात. पाठीवर कवचांची काळपट गडद संरक्षक ढाल बनलेली असते. कवचावरच्या खवल्यांच्या मध्यभागी मोठाले फिकट पिवळे किंवा गडद लाल ठिपके असतात. भौगोलिक क्षेत्रांनुसार त्यात फरक दिसतो. या कासवांमध्ये दोन जाती आहेत. एकाच्या पायावर लाल ठिपके असतात, तर दुसर्‍याच्या पायावर पिवळे. अँमेझॉन नदीचं खोरं हा त्यांचा नैसर्गिक अधिवास. गवताळ प्रदेश हे त्यांचं वास्तव्याचं मुख्य ठिकाण.
ही कासवं सर्वभक्षी असतात. वनस्पती, गवत, पानं, फळं, फुलं, बुरशी आणि लहान-लहान प्राणी त्यांच्या आहारात असतात. ऋतुबदलांनुसार कडक कोरड्या उन्हाळ्यात ही कासवं पूर्णत: निष्क्रिय व सुप्त निद्रावस्थेत जातात. पाठीवरचं आणि पोटावरचं संरक्षक, कठीण कवच हे कासवाचं वैशिष्ट्य. कवचांच्या कडा जाड आणि कठीण असतात. या कवचात त्यांचं मऊ शरीर आणि आक्रसून घेतलेले पाय व डोकं हे भाग लपतात. डोकं चौरस असतं. वरचा भाग चपटा असतो. डोळे मोठे असतात. मध्यभागी काळं बुबूळ असतं. वरचा जबडा वरून खाली वळलेला असतो, तो खालच्या जबड्यावर चपखल बसतो. मध्यभागी त्याला खाच असते. डोक्यावर थोडे मोठे खवले असतात. ते मानेकडे बारीक होत जातात.
नराचं शरीर अधिक आकर्षक रंगाचं असतं. मान आक्रसल्यावर डोकं संरक्षक कवचाआड दडतं. पाय दंडगोलासारखे असतात. पुढच्या पायाला चार तर मागच्या पायाला पाच नख्या असतात. पुढच्या पायाची टोकं जास्त चपटी असतात. पोहायला व बिळं करायला ती उपयोगी पडतात. शरीराला मागे छोटसं मांसल शेपूट असतं. मादीचं शेपूट थोडं त्रिकोणी असतं. शेपटीची हालचाल दोन्ही बाजूला होते.
ही कासवं साधारणत: दुपारी तीननंतर जास्त प्रमाणात वावरू लागतात. उष्ण हवामानात फक्त सकाळी आणि संध्याकाळीच त्यांचा वावर दिसतो. अन्न कमी मिळायला लागलं, की ती सुप्तावस्थेत जातात. भरपेट खाणं झालं, की ती डॉ. क. कृ. क्षीरसागर
सव आपल्याला लहानपणीच्या ससा-कासव शर्यतीत भेटलेलं असतं. त्यात कासवच जिंकतं ते चिकाटीने, सातत्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. कासवाची ही बुद्धिमत्ता शोधून काढण्याकरिता एक शास्त्रीय प्रयोग इंग्लंडच्या 'ं१्रं'>वल्ल्र५ी१२्र३८ ा छ्रल्लू'ल्ल/ं१्रं'>' येथील प्राध्यापक संशोधक अन्ना विल्किन्सन यांनी केला. कासवाच्या प्रशिक्षणक्षम बुद्धि-चाचणीसाठी प्रलोभन पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या प्रयोगात आधुनिक इलेक्ट्रॉनिक 'टच स्क्रीन' तंत्रज्ञानाची योजना होती. प्रायोगिक प्राणी होता 'रेड फुटेड टॉरटॉईज, चेलोनिडी कुळातलं चेलोनॉइडीस काबरेनारिया, हे कासव. त्यांना पाण्याच्या काचेच्या टाकीत सोडलं होतं. एका बाजूला 'टच स्क्रीन' होता. त्या पडद्याच्या मधोमध एक लाल त्रिकोण प्रकाशित करण्यात आला होता. दोन्ही बाजूला योजनापूर्वक प्रकाशित करता येणारी निळी वतरुळं होती. प्रयोगकर्त्याच्या आदेशानुसार ती प्रकाशित झाल्याचं पाहून लगेच प्रतिसाद देण्यासाठी मधल्या लाल त्रिकोणाला नाक टेकवायचं व नोंद व्हायची. प्रत्येक यशस्वी प्रयत्नाला कासवांना बक्षीस मिळायचं स्ट्रॉब

ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष

ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष


वृक्ष नित्यनेमाने वाढतात, फुलतात असा आपला नेहमीचा अनुभव आहे. मात्र, सृष्टीत काही वृक्ष असे आहेत, की ते त्यांच्या आयुष्यात एकदाच फुलतात. ताल नावाचा महाप्रचंड वृक्ष त्यापैकीच एक.

युष्याचा हेतू काय?
असा खुळचट प्रश्न माणूस सोडून कुठल्याही सजीवाला भेडसावत नसतो. उगीचच मोक्षप्राप्ती, जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका इत्यादी तात्त्विक चर्चा नाही. जगण्याचे उद्देश दोन, एक म्हणजे स्वत: जगणं आणि आपला वंश जगवणं.
छायया सुखवन्त्यन्यां,
सहन्ते परमातपम्।
फलान्यपि परार्थाय
वृक्षा सत्पुरुषाइव।।
असे गोडवे माणूस गात असला तरी उद्या समजा वनस्पती बोलू लागल्या, तर त्या म्हणतील, ''आम्ही स्वत:साठी जगतो, आमचं वंशसातत्य टिकवण्यासाठी फुलतो आणि फळतो. तुम्ही केवळ तुमच्या फायद्यासाठी आम्हाला असे 'सद्गुण' चिकटवले आहेत.''
वनस्पतीमंडळीचं हे प्रतिपादन शंभर टक्के खरं आहे. त्या फुलतात, फळतात आणि फळांमधील बियांपासून वनस्पतीची पुढची पिढी अस्तित्वात येते. अनेक वनस्पती दरवर्षी नियमितपणे फुलतात, त्यांच्याजवळ त्यांचं स्वत:चं कॅलेंडर असतं. आंब्यासारखे वृक्ष आयुष्याची पहिली चार-पाच वर्षे नुसते वाढतात. नंतर त्यांना फुलं येतात आणि फळं धरतात. एकदा हे चक्र सुरू झालं, की हयातभर चालतं.
दोन-तीन महाभाग मात्र या आयुष्यपद्धतीला अपवाद. ते आयुष्यात एकदाच फुलतात. फुलणं ही क्रिया अतिशय महाग आहे. त्याला भरपूर अन्नसाठा हाताशी असावा लागतो. 'गदिमां'नी उगीच नाही म्हटलं, 'सोसता सोसेना संसाराचा ताप। त्याने मायबाप, होऊ नये।।' तेव्हा पुरेसा बँक बॅलन्स तयार झाला, की मगच फुलायचं.
'कॉरिफा अंब्राक्युलिफेरा' हा एक असाच महावृक्ष- आपल्या शब्दात तालवृक्ष. दक्षिण भारतात विशेषत: केरळमध्ये, तसेच कर्नाटकात काही भागांत हा वृक्ष आढळतो. श्रीलंकेत याला राष्ट्रीय वृक्षाचा मान आहे. कॉरिफा हे लॅटिन नाव, ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>या ग्रीक सं™ोपासून तयार झालं आहे. ं१्रं'>ङ१४स्रँी /ं१्रं'>याचा अर्थ डोकं, माथा. हा संदर्भ या वृक्षाच्या अजस्र फुलोर्‍याचा. तर अंब्राक्युलिफेराचा अर्थ विशाल छत्र. पूर्ण वाढलेला तालवृक्ष म्हणजे एक अवाढव्य छत्रीच. पण सांभाळून. कारण छत्रीचा दांडा काटेरी. हे काटे जवळ-जवळ एक सें.मी. लांब. गळून पडलेल्या पानांचे तळ खोडावर टिकून राहतात आणि बुंध्यावर चिलखत तयार करतात.
पानं पंख्यासारखी मोठय़ा आकारमानाची. जवळ-जवळ दोन ते चार मीटर रुंद. मात्र, हे पर्णपातं अखंड नसून त्यांच्या पर्णिका अग्रभागी स्वतंत्र तर नंतर जुळलेल्या असतात. या पानांपासून लांबलचक पट्ट्या काढून त्यांच्या मध्यशिरा बाजूला करतात. या पट्ट्या नंतर पाण्यात उकळून वाळवतात व त्यांना घासून पुसून झिलईयुक्त केलं जातं. दक्षिण भारतात प्रचलित असलेला ज्योतिष-भविष्य कथन करणारा 'नाडी'ग्रंथ याच पट्ट्यांवर लिहिलेला आहे, असं म्हटलं जातं. प्राचीन काळी म्हणजे कागदाचा शोध लागण्यापूर्वी याच तालपत्रावर पोथ्या लिहिल्या गेल्या. वयाची चाळिशी गाठली, की तालवृक्ष फुलतो. आयुष्यात एकदाच! अंदाजे पंचवीस ते तीस मीटर उंचीच्या खोडाच्या अग्रभागी सातआठ मीटर उंचीचा फुलोरा म्हणजे एक प्रचंड कारंजंच. फुलं अतिशय लहान आकारमानाची. ती मत्स्यगंधा असतात तशीच योजनगंधाही. या मत्स्यगंधांवर भाळणारे 'पराशर' कीटकही आहेतच. तालवृक्ष कधी फुलणार याचा सुगावा लागला, की स्थानिक लोक त्याचा शिरच्छेद करतात. कारण त्याच्या बुंध्यात स्टार्चचा प्रचंड साठा असतो. हाच साठा वापरून ताल आपली संतती-फळं वाढवणार असतो. त्याच्या शिरकाणामुळे सगळंच संपतं, तालवृक्ष पुन्हा उभा राहत नाही.
बुंध्यातील स्टार्चपासून साबुदाणा करतात. चुकून-माकून ताल फुलू दिला, तर त्याच्या फळांनाही व्यावहारिक मूल्य आहे. तालवर्गीय आणखी एक सदस्य म्हणजे ं१्रं'>ढँ८३ी'ीस्रँं२/ं१्रं'>; अर्थात वनस्पतींमधील हत्ती. याच्या बिया हस्तिदंतासारख्याच वापरता येतात. तसाच वापर तालवृक्षाच्या बियांचा होतो. यावर कोरीव काम करता येतं, त्याच्या गुंड्या करतात. रंगवून त्याला पोवळ्याचं रूप दिलं जातं. मुंबईच्या जिजामाता उद्यानात दोन तालवृक्ष होते. पैकी एकानं फुलून आणि फळूनही आपली जीवनगाथा नुकतीच संपवली.