Blogroll

लहानग्यांना दमा Asthma in Children

लहानग्यांना दमा Asthma in Children 



शहरांच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर, कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच अँलर्जी व दमा असणार्‍या बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्‍चितच त्यांचा आजार आटोक्यात राहू शकतो. कमकुवत प्रतिकारशक्ती
हल्ली फास्टफूडच्या जमान्यात मुलांना पोषक व परिपूर्ण आहार मिळत नाही. मैदानी खेळ, नियमित व्यायाम यांचा अभाव यांमुळे त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवतच असते. याचाच दृश्य परिणाम म्हणजे लहान मुलांमध्ये अँलर्जी व दम्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली दिसून येते. आपल्या अवती- भवती नजर टाकल्यास हल्ली कितीतरी बालके इनहेलर, स्पेसर व नेब्युलायझर दिसतात. शहरांच्या प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांचा धूर, कारखान्यातला धूर, त्यात भर म्हणजे फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर.. या सर्वांमध्ये आपली भावी पिढी अगदी गुदमरून जात आहे. नियमित औषधोपचारांबरोबरच अँलर्जी व दमा असणार्‍या बालकांची विशेष काळजी घेतल्यास निश्‍चितच त्यांचा आजार आटोक्यात राहू शकतो. ह/ल्ली दमा व अँलर्जीचे (त्वचेची अँलर्जीक र्‍हाइनाइट्स (सर्दी) नियंत्रण करणारी उत्तम औषधे, श्‍वसनावाटे औषधे घेण्याची उपकरणे उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ही औषधे नियमित द्यावीत. औषधे घेणे अचानक बंद केल्यास अँलर्जी व दमा बळावतो.
ज्य/ा घटकांमुळे अँलर्जी दमा बळावतात, त्यांना ळ१्रॅgor AÀfे म्हणतात. धूर, धूळ, परागकण, बुरशी, रासायनिक पदार्थ, आहारातील ठरावीक पदार्थ, थंड पदार्थ, जंतुसंसर्ग या कारणांनी दमा अथवा अँलर्जी उद्भवू किंवा वाढू शकतो. दमा अचानक बळावल्यास तातडीने वापरण्यासाठी उत्तम औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी फवारा सतत जवळ बाळगावा.
स्ांब/धित साधने वापरण्याचे योग्य तंत्र आपल्या डॉक्टरांकडून शिकून घ्यावे. अन्यथा त्यातील औषध फुफ्फुसांपर्यंत पोहचणार नाही. औषध घेण्याचे उपकरण आठवड्यातून एकदा धुवून कोरडे करून घ्यावे. नेब्यूलायझेशन करताना प्रत्येक रुग्णासाठी वेगळा मास्क व ट्यूब वापरावी.
झाेपण्/याची खोली, अंथरूण व उशा यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता गालिचे, केसाळ खेळणी, पांघरुणे वापरू नयेत. त्यात धूळ अडकते. त्याऐवजी सुती (धुता येण्याजोगी) पांघरुणे व चादरी वापराव्यात. आवश्यक तेवढय़ाच चादरी व उशा अंथरुणात ठेवाव्यात. फारशी धूळ बसणार नाही अशा कापडाच्या खोळी (१ी२्र२३r) Uf´fSXf½यात. 
घरात प्/ाळीव प्राणी ठेवणे टाळावे. हे शक्य नसल्यास त्यांचा बिछाने, सोफा इत्यादींशी संपर्क येऊ देऊ नये.
अगरबत्ती /अथवा रूम फ्रेशनर वापरू नये.
धूळ झटकण/े, रंगकाम, जंतुनाशक फवारणी (ढी२३ उल्ल३१'), °fT¯fZ B°¹ffदी गोष्टी करताना लहान मुलांना दूर ठेवावे.
मुलांना सक/स व चौरस आहार द्यावा. दिवसातून ४ वेळा विभागून द्यावा. भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. अँलर्जी वाढवणारे पदार्थ मात्र टाळावेत. दही, चॉकलेट, मैदा, अतिसाखर इत्यादी पदार्थ कफाचे प्रमाण (चिकट स्राव) वाढवतात. तेव्हा वरील पदार्थ टाळावेत.


मोकळय़ा हवेत /मैदानी खेळ खेळण्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. ऑक्सिजन भरपूर मिळतो. प्रतिकारशक्तीही वाढते. तेव्हा आपल्या मुलांना नियमित खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. 
घरातील दम्याची/ औषधे पूर्ण संपण्याच्या आधीच विकत घेऊन ठेवावीत म्हणजे उपचारात खंड पडणार नाही.
सर्दी, पडसे झाल्य/ास दमा बळावू शकतो. अशा वेळी बर्‍याच रुग्णांना अल्ल३्र्रु३्रू२ देऊन जंत्fbÀfaÀf¦fÊ लवकरात लवकर बरा करावा लागतो. तेव्हा सर्दी पडशाकडे दुर्लक्ष करू नये.
सर्दी व स्वाईन फ्लू ट/ाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. दमा व अँलर्जीक सर्दी असणार्‍या बालकांनी ही लस दर वर्षी घ्यावी. 
तीव्र गारठय़ापासून ब्/ाळांना जपावे तसेच अंघोळीनंतर केस त्वरित पुसून कोरडे करावेत.
पालकांच्या धूम्रपानाम्/ाुळेही मुलांना त्रास उद्भवतो. तेव्हा मुलांसमोर धूम्रपान टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या बालकास दमा आहे, हे स्वीकारून त्यावर नियमित उपचार करणे आवश्यक आहे.


विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist

विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist 


विश्वेश्वरया Vishveshwarya Scientist
'सि व्हिल इंजिनियरिंग' हे एक मोठं शास्त्र आहे. 'बांधकामाशी संबंधित' एवढीच या शास्त्राची र्मयादा नाही, त्या मध्ये अनेक छोट्या-मोठय़ा विषयांचा, कला-कौशल्यांचा अंतर्भाव आहे. मूलभूतशास्त्रात स्वत:ला पूर्ण झोकून नवभारत घडविण्यात ज्यांचा मोठा सहभाग होता, त्यात डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरैया यांचं नाव अग्रणी आहे. ते मूळचे कर्नाटकातील मदनहळ्ळी गावचे होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असूनही ते पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून १८८३ मध्ये सर्वप्रथम येऊन पदवीधर झाले. मुंबई प्रांताच्या पाटबंधारे खात्यात मुख्य अभियंता म्हणून त्यांनी अभिनव कल्पनांचा उपयोग करून रचनात्मक कार्य सुरूकेले. त्यांनी केलेले काम 'ब्लॉक सिस्टीम' आणि 'ऑटोमॅटिक गेट्स' म्हणून आजही परिचित आहे, कारण त्यामुळे पाणी-साठवण करण्याची धरणांची क्षमता वाढली. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा पाणीपुरवठा त्यांनी सुधारला. पुण्याच्या खडकवासला धरणाचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

म्हैसूरचे राजे कृष्णराज ओडेयार (१८९३-१९४0) यांच्या कारकिर्दीत ते दिवाण होते. इंग्रज सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला होता. विश्‍वेश्‍वरैया यांनी जेव्हा जोग धबधबा पाहिला तेव्हा ते निसर्गसौंदर्य पाहून स्तिमित झाले; पण पाणी वाया जातंय हे पाहून व्यथितही झाले. त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.
अनेक प्रकल्पांसाठी पंडित नेहरू त्यांचा सल्ला घेत असत. समृध्द भारताचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न करणार्‍या सर विश्‍वेश्‍वरैया यांना १९५५ मध्ये 'भारतरत्न'चा सन्मान प्राप्त झाला. 


होमी भाभा Homi Bhabha

होमी भाभा Homi Bhabha 

होमी भाभा Homi Bhabha



होमी भाभा Homi Bhabha  : - (१८0९ - १९६६) अणुशक्तीमुळे आपल्या देशाची उन्नती होत राहील, असं पंडित नेहरुंना वाटत होतं. डॉ. होमी भाभा हेच या प्रकल्पाची जबाबदारी घेऊ शकतील याची पंडितजींना खात्री होती. भाभांचं शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेज आणि बंगलोरला इंडियन इंन्स्टीटयूट ऑफ सायन्स येथे झाले. त्यांना पॉल डि-याक, एन्रिको फर्मी, जेम्स श्याडविक, अर्नेस्ट रुदरफोर्ड, निल्स बोहर अशा दिग्गज शास्त्रज्ञांबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघानं १९५५ मध्ये 'शांततेसाठी अणुशक्ती'वर एक (पहिलाच) परिसंवाद जिनिव्हा येथे आयोजित केला होता. त्याचे अध्यक्ष होमी भाभा होते. भारतातील पहिली अणुभट्टी १९५६ साली भाभांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. त्यावेळी आशियात फक्त रशियाकडे अणुभट्टी होती. अणुविद्येत भाभा जगात आघाडीवर होते. सर्व दिशांकडून पृथ्वीवर अदृश्य वैश्‍विक किरणांचा वर्षाव होत असतो. त्यातील अनेक गूढगोष्टी त्यांनी उकलून दाखवल्या. त्यांनी मेसॉन या एका अतिसूक्ष्मकणाचे सखोल संशोधन केले. त्यांच्या प्रायोगिक पुराव्यामुळं अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताला बळकटी आली. मूलभूत विज्ञानाचं महत्व ओळखून त्यांनी मुंबईला 'टाटा इंस्टीटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' या संस्थेची स्थापना करण्यात सक्रीय भाग घेतला. 
होमी भाभांमुळे कृषी, वैद्यक आणि अभियांत्रिकी क्षेत्रांना उपयुक्त असणारी किरणोत्सर्गी मूलद्रव्यं तयार होऊ लागली. अणुऊर्जा तयार करताना 'जड पाणी' लागते. त्यात भारत स्वयंपूर्ण झाला. पंडित नेहरुंचं स्वप्न साकारण्यात होमी भाभा यांना यश मिळत असताना एक दुर्घटना घडली. २४ जानेवारी १९६६ रोजी युरोपकडे भाभांना घेऊन जाणारे विमान आल्प्स पर्वतराजींमध्ये कोसळून त्यांचा अंत झाला. होमी भाभा हे उत्तम कवी, चित्रकार, पर्यावरणप्रेमी आणि व्हायोलिनवादक होते. निर्घृण काळानं घात केला नसता तर त्यांनी निश्‍चितच अणुविज्ञानशास्त्रात खूप मोलाची भर घातली असती.  

अदृश्य शाई, Invisible Ink

 अदृश्य शाई, Invisible Ink, Making Invisible Ink using Lemon


करून पहा प्रयोग उद्देश : लिंबाच्या रसाचे वैज्ञानिक उपयोग तपासणे
साहित्य : अर्धे लिंबू, कापसाचा बोळा गुंडाळलेली काडी, विजेचा दिवा, कागद, पाणी व पेला.
कृती : पेल्यामधील पाण्यात लिंबू पिळा. हे रसायन चांगले ढवळा, त्यामध्ये काडीला लावलेल्या कापसाच्या बोळ्याचे टोक बुडवा व याच रसाने कागदावर मजकूर लिहा. हा मजकूर डोळ्यास दिसणार नाही. हा कागद सुकू द्या. सुकल्यानंतर विजेचा दिवा चालू करा. या गरम दिव्याजवळ हा धरा. हळूहळू लिंबाच्या रसाने लिहिलेला सर्व मजकूर दृश्य होईल.

निष्कर्ष:लिंबाच्या रसातील कबरेदके ही रंगहीन असतात. परंतु ती सुकवून, तापवल्यावर त्या संयुगाचे विघटन होते व त्यातील कार्बन काळा पडतो व दृश्य होतो कारण लिंबामधील अँस्कॉर्बिक आम्लाची रासायनिक क्रिया उष्णतेमुळे कबरेदिकांवर होते.

धूमकेतू आकाशातला पाहुणा Comet in the Sky

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky 

धूमकेतू  आकाशातला पाहुणा Comet in the Sky


पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे इतर ग्रहसुद्धा वेगवेगळ्या लंबगोलाकार कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असतात, हे तुम्हाला माहीत आहे. सूर्यमालेतल्या ग्रह आणि उपग्रहांप्रमाणेच धूमकेतूसुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. फरक इतकाच की धूमकेतू हे खूप मोठय़ा कक्षांमधून सूर्याभोवती फिरत असल्याने ते क्वचितच सूर्याजवळ येतात. धूमकेतू सूर्याजवळ येतात, तेव्हा ते आपल्याला दिसण्याची शक्यता असते.
धूमकेतू म्हणजे गोठलेला कार्बन डायऑक्साईड वायू, बर्फ आणि धूलिकण यांचा गोळा असतो. जसजसा धूमकेतू सूर्याजवळ यायला लागतो, तसंतसं सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं तापमान वाढायला लागतं. तापमान वाढल्यामुळे धूमकेतूमधले वायू प्रसरण पावतात आणि धूमकेतूला लांबच लांब शेपूट फुटते.
असाच एक धूमकेतू सध्या आपल्या भेटीला आला आहे. या धूमकेतूचं नाव आहे 'आयसॉन.' सध्या आयसॉन धूमकेतू दुर्बिणीच्या किंवा बायनॅक्युलरच्या मदतीने पाहता येतो. साधारणपणे १८ नोव्हेंबरपासून हा धूमकेतू सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व दिशेला कन्या तारकासमूहातल्या चित्रा तार्‍याजवळ पाहता येईल. २८ नोव्हेंबरच्या सुमारास तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल असा अंदाज आहे. काही वेळा सूर्याच्या उष्णतेने धूमकेतूचे तुकडे होतात. आयसॉन धूमकेतू जर सूर्याच्या उष्णतेने फुटला नाही, तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यंत तेजस्वी अशा आयसॉन धूमकेतूचं दर्शन आपल्याला होईल.
आयसॉन धूमकेतूचा शोध विताली नेवेस्की आणि आर्टिअम नोविचोनोक या दोन रशियन खगोलशास्त्रज्ञांनी २४ सप्टेंबर २0१२ या दिवशी दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करताना लावला. या धूमकेतूचं शास्त्रीय नाव आहे - ू/2012 २1. या नावातल्या ह्यू चा अर्थ असा आहे, की हा धूमकेतू ठरावीक कालावधीनंतर सूर्याच्या जवळ येणार्‍या धूमकेतूंसारखा नाही. आयसॉन धूमकेतू एकदाच सूर्याच्या जवळ येणार असल्याने हा धूमकेतू परत आपल्याला दिसणार नाही. म्हणूनच आपल्या भेटीला एकदाच येऊ शकणार्‍या या आकाशातल्या पाहुण्याचं आपण जोरदार स्वागत करायला हवं! पण या धूमकेतूच्या दर्शनासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला मात्र लागेल. मग काय, आहे ना तयारी तुमची?

Birbal Sahani प्रो. बिरबल साहनी

Birbal Sahani प्रो. बिरबल साहनी : १८९१-१९४९- प्राचीन काळातील वनस्पती काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या खर्‍या; पण जाताना काही वनस्पतींनी आपला ठसा जणू शिलालेखात कोरावा तसा कोरला होता. संशोधक त्याला 'जीवाश्म' म्हणतात. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर प्राचीन काळच्या जीवसृष्टीचा मागोवा घेता येतो. या संशोधनाकरिता बुद्धी, चिकाटी आणि कौशल्याची गरज असते. या तिन्हीचा त्रिवेणी संगम लाभलेली महान व्यक्ती म्हणजे प्रो. बिरबल साहनी! त्यांना लहानपणापासूनच वृक्ष-वेली, झाडे-झुडपं याचं सखोल निरीक्षण करण्याचा छंद होता. शालेय जीवनात त्यांनी पाने-फुले आणि चित्र-विचित्र दगडांचे नमुने जमवून त्यांचा एक आकर्षक संग्रह तयार केला होता. त्यांचे वडील रुचीराम साहनी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. ते विज्ञान-प्रसारक आणि पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बिरबल यांना सतत प्रोत्साहन दिलं. उत्कृष्ट संशोधनामुळं त्यांना इंग्लंडमध्ये 'एफ आर एस' होण्याचा मान मिळाला. बिरबल साहनी हे पंडित नेहरू यांचे स्नेहांकित होते. दोघांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर होती! पंडितजींनाही जीवाश्मांमध्ये विलक्षण आकर्षण वाटत असल्यामुळं त्यांनी या विषयाचं एक जागतिक दर्जाचं संशोधन करणारी संस्था स्थापन करण्यासाठी डॉ. बिरबल यांना उद्युक्त केलं. लखनौ येथे ही संस्था स्थापन व्हावी म्हणून अखंड परिश्रम करून डॉ. साहनी यांनी एक आदर्श आराखडा तयार केला. या प्रयोगशाळेच्या पायाभरणी समारंभाला ३ एप्रिल १९४९ रोजी पंतप्रधान नेहरू आले होते. दुर्दैवानं एक आठवड्यानंतर (१0 एप्रिलला) अतिश्रमामुळं बिरबल साहनी यांचं निधन झालं. त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची पत्नी सावित्री साहनी यांनी हिकमतीनं 'बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पालीओबॉटनी'ची उभारणी केली. पंडितजी पुन्हा त्या संस्थेत (२-१-१९५३) उद््घाटनासाठी आले. आज ती संस्था खरोखरीच जगन्मान्य झाली आहे.   

कासवांची कहानी Development of Tortoise

कासवांची कहानी Development of Tortoise 



सागरी कासवं भरपूर पोहतात. ते साहजिकच आहे. ते दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. साधारणपणे १0 कोटी वर्षांपूर्वी कासवांनी सागर प्रवासास सुरुवात केली. त्या वेळी ही कासवं इतकं चांगलं पोहू शकत नसावीत, असे पुरावे काही वर्षांपूर्वी हाती आले आहेत. ब्राझीलच्या जागी एकेकाळी जो सागर होता; त्या सागरात ११ कोटी वर्षांपूर्वी वावरणार्‍या कासवाचे अवशेष काही जपानी पुराजीव शास्त्रज्ञांना सापडले. ११ कोटी वर्षांपूर्वीचे हे अवशेष अभ्यासून या शास्त्रज्ञांनी अनेक तर्क केले; त्यानुसार हे कासव २२ ते २५ सें.मी. लांब असावं. या कासवाच्या हातापायातली हाडं सुटीसुटी होती. त्यामुळे वल्ही म्हणून या हातापायांचा काही उपयोग नव्हता. जी कासवं दीर्घकाळ पाण्यात राहतात, त्यांच्या हातापायातली हाडं एकमेकांत पक्की बसून ती एकसंध हाडासारखी होतात. अशा हाडांचा वल्ही म्हणून उपयोग होतो. गोड्या पाण्यात राहणार्‍या आणिवारंवार जमिनीवर येणार्‍या कासवांची हाडं अशी एकजीव नसतात. कारण जमिनीवर चालताना ती सांध्यात वाकवावी लागतात, पणजेव्हा या कासवाची कवटी तपासली तेव्हा हे कासव खार्‍या पाण्यात वावरणारं असावं, असं दिसून आलं. त्याच्या डोळ्यातील अश्रूग्रंथी प्रचंडमोठय़ा होत्या. जमिनीवरचे प्राणी सागरवासी बनतात तेव्हा त्यांना शरीरातील खारं पाणी बाहेर टाकण्यासाठी अश्रूंचा उपयोग होतो. त्यांचे अश्रूबिंदू खूप मोठे असतात. त्यातून मोठय़ा प्रमाणावर शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात. त्यावरून हे कासव सागरात वावरणारे होते. पण, त्या काळात त्यांनी नुकताच सागरात प्रवेश केला असावा, असं त्यांच्या अवयवांवरून सिद्ध होतं.

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

द ग्रेट बॅरिअरी रीफ Great Barrier Reef

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे.  

ऑस्ट्रेलियास लाभलेली नैसर्गिक देणगी म्हणजे सभोवताचा अथांग समुद्र. या महासागराची रमणीय सीमा म्हणजे उत्तरेकडून पूर्व दिशेला जोडणारा २0१0 किलोमीटर्स लांबीचा समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि दूरवर पसरलेल्या खोल महासागरास अलग करणारा, पाण्याखाली जेमतेम बुडालेला, लांबलचक खडक 'द ग्रेट बॅरिअरी रीफ' म्हणून जगप्रसिद्ध आहे. हा खडक कॉरल किंवा प्रवाळ कीटकांमुळे तयार झालेला आहे. प्रवाळांबरोबरच कोमट पाण्यात आढळणारे रंगीत मासे, विविध वनस्पती, सहसा पाहण्यास न मिळणारे समुद्रजीवी प्राणी यांचीही इथे रेलचेल आहे. हा समुद्र अतिशय उथळ आणि नितळ असल्याने सूर्याचे किरण पडल्यानंतर सागरी सौंदर्याचा खजिनाच तुमच्या समोर खुला होतो. साध्या डोळ्यांनीही खोल पाण्यातील खजिन्याचे दृश्य स्वच्छ पाहता येते.
हा खडक निर्माण होण्यामागचे शास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे. भूशास्त्रानुसार नैसर्गिक जैविक पध्दतीने तयार झालेला कॉरल हा लाइमस्टोन किंवा चुनखडीचा दगड होय. तो समुद्रातील प्रवाळासारखे लाखो जलचर कीटक किंवा छोट्या प्राण्यामुळे तयार होतो. हे समुद्रप्राणी जेलिफिश, हाइड्रा, सी अँनीमोन इत्यादी. या जलचर प्राण्यांचा आकार पोकळ गोल नळीसारखा असून ती जणू काय त्याची अन्ननलीकाच असते. त्यांच्या शरीराचे एक टोक समुद्राच्या तळातील खडकाला चिकटलेले असते तर दुसरे टोक म्हणजे त्याचे तोंड होय. या तोंडाभोवती ६ ते १0 सें.मी. लांब-वळवळणारा, बारीक अस्थिविरहीत, सोंडेसारखाअवयव असतो. त्याचा उपयोग सूक्ष्म जीव, वनस्पती पकडून अन्न म्हणून तोंडात टाकण्यासाठी होतो. हे सर्व जलचर प्राणी एकमेकावर रचले जाऊन पुढे ते एकमेकांना चिकटून राहतात. नंतर त्यांची एक मोठी वसाहत तयार होते. जोडलेल्या स्थितीत ते समुद्रातील कॅल्शियम काबरेनेट घेतात. त्याचे थर हळूहळू शरीराच्या खालच्या बाजूला जमा होतात. मग त्याची विशिष्ट रचना तयार होते. प्रजोत्पादन सतत चालू असल्याने त्यांची संख्या वाढत जाते.

त्यातले काहीं प्रवाळ (कॉरल) वेगळे होऊन आपली वेगळी वसाहत तयार करतात. तर मोठे जलचर प्राणी कॉरलची अंडी किंवा कॉरल चक्क खातात. मात्र त्यांची तितकीच झपाट्याने वाढ होऊन समातोलपणा किंवा बॅलन्स राखला जातो.
प्रवाळांच्या विविध रंगात, निरनिराळ्या आकाराच्या वसाहती तयार होतात. जेंव्हा पहिला जलचर प्राणीसमूह मरतो तेंव्हा त्याच्यावर दुसरा त्याच जातीचा प्राणी समूह तयार होऊन वसाहतीची वाढ सतत चालू ठेवतो. तो समुद्रात ५0 मीटरपेक्षा कमी खोलीवर चुनखडी किंवा लाइमस्टोन स्वरुपात आढळतो. हाच ऑस्ट्रेलियाच्या पूर्व समुद्रकिनार्‍यावरील उथळ पाण्यातील, जेमतेम बुडालेला, लांबलचक कॉरलरुपी 'द ग्रेट बॅरिअर रीफ' (Great Barrier Reef)  खडक होय.
असा खडक समुद्रात निर्माण होण्यास अनेक वर्षे लागतात. कॉरल जिवंत असतो तेव्हा ही निसर्ग किमया चालू असते. अनेक वर्षानंतर जेंव्हा तो मृत होतो तेंव्हा किनार्‍याच्या दिशेने वाहून येतो. तोड-मोड करुन त्याचा नाश केला तर मात्र तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत 'द ग्रेट बॅरिअर रीफ' चा समावेश आहे. आज तो 'द ग्रेट बॅरिअर रीफ मरीन पार्क' म्हणून ओळखला जातो.
भारतात अंदमान-निकोबार द्वीप समूहाच्या जॉजलीबॉय बेटाच्या समुद्रकिनार्‍यावर अशा प्रकारचा सागरी सौंदर्याचा खजिना आहे. तो पाहण्यासाठी ग्लासबॉटम बोटीतून समुद्रावर चक्कर मारावी लागते. बोटीच्या काचेतून खाली पाहताना पांढरा, निळा, गुलाबी रंगाच्या कॉरल्स विविध आकारांत (उदा. निवडूंग, मश्रूम, पक्ष्याचा पंख) पाहण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला पाहिजे. त्या शिवाय तर्‍हेतर्‍हेने रंगीबेरंगी मासे, समुद्री वनस्पती, जलचर प्राणी स्वच्छ पाण्यात सहज पाहू शकता. किनार्‍यावर सापडणारी पांढरी रेती ही कॉरल्सची नैसर्गिकरीत्या झीज होताना तयार होते.
कॉरल किंवा प्रवाळपासून, पोवळी, खडे, मणी व इतर वस्तू बनवितात. आज सगळीकडे पोवळ्याला चांगली मागणी आहे कारण ते नवरत्नापैकी एक रत्न आहे.
(लेखक विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.) ग्रेट बॅरिअर रीफ या नैसर्गिक खडकांत अनेक लहान बेटांचासुध्दा समावेश होतो. हा खडक म्हणजे सुमारे २५00 छोट्यामोठय़ा प्रवाळ कीटकांमुळे पाण्याखाली निर्माण झालेली विशिष्ट प्रकारची वस्तुस्थिती आहे. प्रवाळांच्या रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या सुमारे ४00 जाती त्यात पाहण्यास मिळतात. ते पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे. त्यावर लाल-पिवळा-नारंगी-जांभळा-पांढरा-निळा-गुलाबी-हिरवा अशा मनोहर रंगांचे दर्शन होते.
प्रवाळांचे विविध आकार म्हणजे, निवडूंगाचे झाड, मश्रुम किेंवा लोटस वनस्पती, झाडाच्या पसरलेल्या फांद्या, पक्ष्याचे पसरलेले पंख, सांबराचे शिंग, गोलघुमट किंवा डोम, चर्चमधील ऑरगनच्या पाइप्सचा एक गट पाहायला मिळतात.


कीटका द्वारे कीटकांचा नाश पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटका द्वारे कीटकांचा नाश  पॅरासायटॉइड परउपजीवी

कीटकांचा नाश करायचा असेल तर त्यांना मारणार्‍या दुसर्‍या कीटकांचा त्यासाठी उपयोग केला जातो. ही पद्धती अभ्यासाने विकसित केली आहे व त्याचा उपयोग पिकांचे संरक्षण करण्यासाठी होतो. कीटक परजीवी कीटकांच्या अंडी अथवा अळी किंवा कोश या अवस्थांवर अथवा त्या अवस्थांच्या आत स्वत:ची अंडी घालतात किंवा अळ्या सोडतात त्यांना 'परउपजीवी' (पॅरासायटॉइड) म्हटले जाते. हे परउपजीवी कीटक आपल्या अळ्यांद्वारा त्या त्या परजीवी कीटकांचा पूर्णपणे नाश करतात. अळ्यांची खाबूगिरी हे त्याचे कारण होय. या कीटकांमध्ये मुख्यत: विविध प्रकारच्या गांधीलमाशा आणिमांसभक्षी द्विपंखी माशा यांचा भरणा आहे. त्यांची देण्यासारखी असंख्य उदाहरणे आहेत. परंतु नमुन्यादाखल काही प्रमुख कीटकांचा उल्लेख करता येणे शक्य आहे.
भाताच्या रोपांवर फडका नाकतोडा उपजीविका करतो आणि पिकाचे नुकसान करतो. त्याच्या अंड्यांमध्ये स्केलिओ नावाची गांधीलमाशी अंडी घालते. त्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या नाकतोड्याच्या अंड्यांचा, अंड्यातील अन्नांश खाऊन नाश करतात. नाकतोड्याची पिल्ले जन्मासच येत नाहीत. भाताचे पीक वाचू शकते. भाताच्या पानांवर मेलॅन्टिस लिडा या फुलपाखरांच्या अळ्या भूक भागवण्यासाठी हल्ला करतात. या अळ्यांच्या शरीरांत टेलोनोमस, अपानटेलस या गांधीलमाशा अंडी घालतात. या अंड्यातून गांधीलमाशांच्या अळ्या बाहेर आल्यावर फुलपाखराच्या अळ्या फस्त करतात. फुलपाखराच्या पुढील अवस्था तयार होत नाहीत.
गव्हाच्या पानांवर लष्करी अळ्या चरत असतात. या अळ्यांचे जीवन, अपानटेलस गांधीलमाशा आणिसारकोफॅगा माशा त्याच प्रकारे संपवतात. उसाच्या शेंड्याचा भाग स्किरपोफॅगा पतंगाच्या अळ्या पोखरतात. या अळ्यांवर ट्रायकोग्रामा ही मांसभक्षी माशी स्वत:ची अंडी घालते. पतंग अळीचा नाश होतो. शेतकी प्रशालांच्या अथवा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोग्रामाच्या लाखो अळ्यांची पैदास केली जाते. नंतर लाखो कोशावस्था व प्रौढ माशा उसाच्या वावरात सोडतात. पोखर किडीचे नियंत्रणहोते. झुरळाची मादी आपली अंडी अंडी धारिकेमध्ये संरक्षित करते. परंतु, निशाणमाशी त्या अंडीधारकेचे संरक्षक कवच भेदून आपली अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या अंड्यांचा नाश करतात. आपल्या घरातील झुरळांचे अशा प्रकारे नियंत्रणहोत असते, ही बाब अनेकांना ठाऊक नसल्याचे दिसते. ही उदाहरणे अभ्यासली की, पीडक कीटकांचे नियंत्रणनिसर्ग कशा प्रकारे करतो हे लक्षात येते आणिनिसर्गाचे कौतुक करावे तितकडे थोडे असल्याचे जाणवते. कीड नियंत्रणासाठी साधने शोधणारे संशोधक अशा परजीवींच्या आणि परउपजीवींचा सतत मागोवा घेत असतात. त्यातील काहींची ट्रायकोग्रामाशीसारखी मोठय़ा प्रमाणात पैदास करून त्यांच्याद्वारे कीडनियंत्रणकरण्याची शक्यता अजमावून पाहत असतात. प्रत्येक वेळेस यश येतेच असे नाही; पण प्रयत्न थांबत नाहीत.

इंटरनेट रेडिओ Internet Radion India

इंटरनेट रेडिओ Internet Radio India



रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. पूर्वी रेडिओ असलेले घर श्रीमंतच समजले जायचे. काही मोजक्याच घरात रेडिओ असायचा. आता तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण आपल्या मोबाईलमधूनही रेडिओ ऐकू शकतो. इतकेच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्रमात फोनवरून सहभागीही होऊ शकतो. इंटरनेट रेडिओने हे सर्व शक्य केले आहे. गीताच्या विश्‍वामध्ये रेडिओचे महत्त्व किती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आजचे आणि कालचेही अनेक दिग्गज कलाकार – ते नामवंत नसण्याच्या त्यांच्या काळामध्ये - जगापुढे आले, ते फक्त याच माध्यमातून! आजच्या अतिप्रगत, तंत्नशुद्ध, बहुविध आणि बहुगुणी इलेक्ट्रॉनिक साधनांपुढेही रेडिओ टिकून आहे! 
अर्थात, काळाप्रमाणे आणि वापरकर्त्यांच्या गरजेनुसार रेडिओनेही नवे रूप धारण केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तो संगणक आणि सेलफोनवरही वाजू लागला आहे. इंटरनेट रेडिओला वेब रेडिओ, नेट रेडिओ, स्ट्रीमिंग रेडिओ किंवा ई-रेडिओ वेबकास्ट अशी बरीच नावे असली, तरी त्यामागचे मूळ तंत्न एकच असते. 
इंटरनेटवरील संगीताला वेबकास्ट म्हणतात. कारण, पारंपरिक अर्थाने ते बिनतारी प्रक्षेपण म्हणजे 'ब्रॉडकास्ट' वा 'टेलिकास्ट' नसते. अर्थात, इंटरनेट रेडिओचे कार्यक्रम 'स्ट्रीमिंग मीडिया' पद्धतीने प्रसारित होत असल्याने रिप्ले वगैरे करता येत नाहीत. बर्‍याचशा इंटरनेट रेडिओ सेवा पारंपरिक रेडिओ केंद्रांशी निगडित असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील कोणतेही स्टेशन कोठेही बसून ऐकता येते. 
इंटरनेटमार्फत TCP किंवा UDP 'पॅकेज' पद्धतीने श्राव्य आशय सतत प्रसारित केला जातो (स्ट्रीमिंग प्रवाही ऑडिओ) व ही माहिती वापरकर्त्याने स्टेशन निवडल्यावर त्याला पुन्हा ऐकवली जाते. या प्रक्रियेत लहरींची उचलफेक करण्यात एखादा सेकंद जाऊ शकतो. या उशिरास 'रेडिओ लॅग' असे म्हणतात. २000 सालानंतरच्या बदलत्या तंत्नज्ञानामुळे बँड विड्थ्स परवडणार्‍या दरात मिळू लागल्याने अशा रेडिओच्या स्ट्रीमिंगचा दर्जा वाढला आहे.
साधारण ६४ केबी ते १२८ केबी प्रतिसेकंद वेगाने हे स्ट्रीमिंग केले जाते आणि आवाजाचा दर्जा जवळजवळ ऑडिओ सीडीइतका असतो. online radio असा सर्वसाधारण सर्च दिल्यावरही अनेक वेब-पृष्ठे उघडतात. आता तर रेडिओवरच्या कार्यक्रमात आपण आपल्या सेलफोनवरून भाग घेऊ शकतो वा आपले मत तत्काळ नोंदवू शकतो. मोबाईल हँडसेटमध्ये एफएम रेडिओ असेल, तर हे आणखीनच सोपे होते.

सुई न टोचता इंजेक्शन Injection

सुई न टोचता इंजेक्शन Injection 

खाद्या सिरींजसारखीच याची रचना असते, मात्र नेहमीच्या दट्ट्याऐवजी धातूच्या तारेने गुंडाळलेले एक शक्तिमान लोहचुंबक असते. याला लॉरेंट्झ फोर्स अँुएटर म्हणतात. या दट्ट्याच्या पुढे द्रव स्वरूपातल्या औषधाने भरलेली एक कॅप्सूल असते आणि दर्शनी भागात एखाद्या डासाच्या सोंडेइतकी सूक्ष्म आकाराची एक नलिका असते. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक फायदे होतील

रुग्णांच्या मनातील इंजेक्शनची भीती दूर होईल.
हे इंजेक्शन टोचायचे नसल्याने इंजेक्शनद्वारे पसरणारे एड्स, हेपॅटायटिस बी अशांसारखे आजार उद्भवणार नाहीत.
इंजेक्शन देताना परिचारिका किंवा डॉक्टरांना सुई लागून होणारे आजार टळतील.
इंजेक्शनची सिरींज जंतुविरहित करण्याची गरज उरणार नाही.
द्रव स्वरूपातील पोलिओ, बीसीजी, कावीळ अशांसारख्या प्रतिबंधक लसींसाठी त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये सतत ठेवून 'शीतसाखळी' सांभाळावी लागते. अन्यथा त्या लसी कुचकामी ठरतात. पावडर स्वरूपात असलेली लस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज नसल्याने हा धोका तर टळेलच. पण, शीतसाखळीसाठी येणारा मोठय़ा स्वरूपातला खर्चही वाचेल. जेक्शन घ्यायला सर्व जण का घाबरतात? कारण, इंजेक्शनची ती धारदार सुई त्वचेत टोचताना आणि मांसात घुसताना खूप दुखते. नंतर खूप दिवस त्या वेदना होत राहतात. पण, या भीतीवर आता तोडगा निघालाय...कसलीही सुई न वापरता दिले जाणारे इंजेक्शन!
अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) या विख्यात तंत्र विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 'मॅग्नेटिक जेट इंजेक्शन डिव्हाईस' नावाचे एक छोटे सिरींजवजा उपकरण तयार केले आहे. यामध्ये लोखंडी सुई तुमच्या शरीरात टोचण्याऐवजी जे औषध टोचायचे आहे, त्याचा एक गतिमान फवारा ध्वनीच्या वेगाने तुम्हाला वेदना न करता तुमच्या त्वचेत घुसतो. 
विजेवर चालणार्‍या या उपकरणातून जेव्हा विजेचा प्रवाह सोडला जातो, तेव्हा या विजेच्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र एक प्रचंड ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेद्वारे उपकरणातील दट्टय़ा वेगाने पुढे सरकतो आणि कॅप्सूलवर आदळतो. त्यानंतर त्या कॅप्सूलमधील औषध ध्वनीच्या वेगाने म्हणजे सेकंदाला ३४0.२९ मीटरने, या उपकरणाच्या दर्शनी भागी असलेल्या नलिकेतून बाहेर पडते. औषधाचा हा वेग विद्युतप्रवाहाद्वारे कमी-जास्त करता येतो. 
एम.आय.टी.चे शास्त्रज्ञ इयान हंटर आणि कॅथेराईन होगन यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणात खूप वेगाने आणि थोड्या कमी वेगाने औषधाचा फवारा बाहेर पडण्याची सोय आहे. कमरेच्या किंवा दंडाच्या स्नायूमध्ये इंजेक्शन देताना वेगवान फवारा वापरला जातो. पण, जर इन्सुलिनसारखे एखादे इंजेक्शन त्वचेखाली द्यायचे असेल, तर जरा सौम्य गतीचा फवारा वापरता येतो.
वेगवेगळ्या वयाच्या आणि त्वचेच्या वेगवेगळ्या जाडीप्रमाणे वेग कमी-जास्त करता येतो. म्हणजे एखाद्या छोट्या बाळाला एखादी लस किंवा इंजेक्शन देताना खूपच कमी गती लागेल, तर एखाद्या जाड कातडीच्या मजुराला जास्त वेग वापरावा लागेल. त्याचप्रमाणे एखाद्याच्या स्नायूमध्ये ते इंजेक्शन किती खोलवर द्यायचेय, हेदेखील नियंत्रित करता येते.
या तंत्रज्ञानात यापुढे अजून सुधारणा करून पावडर स्वरूपात असलेली इंजेक्शन्स आणि लसी देता येतील, अशी सोय करण्यात आली आहे.