Blogroll

ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार | Driverless Cars In Britain

ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार | Driver-less Cars In Britain

ब्रिटनमध्ये 'ड्रायव्हरलेस' कारच्या प्रकल्पावर काम सुरू असून २०१५च्या सुरुवातीला विजेवर चालणाऱ्या अशा शंभर गाड्या रस्त्यांवर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात बकिंगहॅमशायरमधील मिल्टन किनेस भागातील पदपथांवर हा प्रयोग होणार आहे.
ब्रिटनमध्ये धावणार ‘ड्रायव्हरलेस’ कार, Driver-less Cars In Britain

'ड्रायव्हरलेस' कारमध्ये दोन प्रवासी, तसेच त्यांच्याकडील लगेजसह बसता येईल. स्वतंत्र मार्गिकेवरून १९ किलोमीटर प्रतितास या वेगाने या गाड्या धावणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च ६ कोटी ५० लाख पौंड असून त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कारमधील 'सेन्सर'मुळे मार्गात आलेले अडथळे समजणार आहेत. 'जीपीएस', तसेच ३६० डिग्री सेन्सर्स या गाड्यांना दिशादर्शन करतील.

'स्मार्टफोन अॅप'च्या माध्यामातून प्रवाशांना या कारच्या तिकिटांची नोंदणी करता येईल. २०१७मध्ये या कारच्या चाचण्या पूर्ण होतील. मिल्टन किनेसचे रेल्वे स्टेशन, शॉपिंग सेंटरपर्यंत जाण्यासाठी या कार उपलब्ध असतील. ब्रिटन सरकार आणि वाहन उद्योगातील प्रतिनिधींचा समावेश असलेली 'ऑटोमोटिव्ह कौन्सिल', 'अरूप' ही इंजिनीअरिंग फर्म या प्रकल्पावर केंब्रिज विद्यापीठासोबत काम करत आहे. 

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह

Monoceros constellation मोनोसोरस तारकासमूह 


मोनोसोरस तारकासमूह हा मृगतारका समूहाच्या पूर्वेला आहे. सहसा आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात याची चर्चा होत नाही, कारण एकतर हा चटकन लक्षात न येणारा तारकासमूह आहे आणि याच्या आजूबाजूला अनेक इतर प्रखर तारकासमूह आहेत. तसेच हा तेजोमेघ लहान दुर्बिणीतून फारसा सुंदर दिसत नाही.
पण रोसेट तेजोमेघ खगोलभौतिक शास्त्राच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे ५000 प्रकाशवर्षं अंतरावर आहे, आणि एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा याचा विस्तार १३0 प्रकाशवर्षांचा आहे.
एकेकाळी हा एक प्रचंड मोठा वायूचा मेघ होता. या तेजोमेघात पोकळी निर्माण होण्याचे कारण असे की, कालांतराने याच्या मध्यभागात अनेक तार्‍यांची निर्मिती झाली. खगोलीयसंदर्भात हे तारे तसे तरुण आहेत. त्यांच्या पृष्ठभागावर तापमान ३0,000 केल्विन इतके आहे. या तार्‍यातून निघालेल्या प्रकाशाच्या किरणाच्या दाबामुळे आणि या तार्‍यातून निघालेल्या वायूमुळे या मेघातील कण (प्रामुख्याने हायड्रोजनचे अणू आणि काही इतर अणू आणि रेणू) मध्यभागापासून दूर ढकलले गेले आहेत. तसेच याच्या मध्य भागातील तार्‍यांच्या प्रचंड प्रारणांमुळे हायड्रोजन वायू विद्युतभारीत होतो आणि आणि तो आपल्याला प्रकाशही देतो (अशा प्रकाशाची तुलना घरातील ट्यूब लाईटच्या प्रकाशाबरोबर करता येईल.) या तेजोमेघाचे वस्तुमान इतके आहे की, या पासून अजून दहा हजार सूर्यासारखे तारे बनविता येतील.

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्

Haldi KumKum - हरिद्राकुंकुम्


पूजेच्या विधीत 'हरिद्राकुंकुम् सर्मपयामि' असे म्हणत वाहण्यात येणारे हळद आणि कुंकू हे पूजा साहित्याचे महत्त्वाचे घटक आहेत व व्यापारी दृष्टीनेही महत्त्वाचे पदार्थ आहेत. रंगाने भिन्न असे हे दोन पदार्थ असले, तरी हळदीपासूनच रासायनिक प्रक्रियेने कुंकू बनते. हळदीला औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्व आहे. वप्रकाश या संस्कृत ग्रंथातील पुढील श्लोकात हळदीचे गुणधर्म दिले आहेत.

'हरिद्रा कटुकातिक्ता रुक्ष्णोष्णा कफपित्तनुत्।
वण्र्या त्वग्दोषमेहास्र शोथपाण्डुव्रणापहा ॥'

हळद ही कडवट, तिखट असून, कफघ्न व पित्तनाशक आहे. तिच्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो व जखम बरी करण्याचेही सार्मथ्य तिच्यात आहे. हळदीवर बरेच आधुनिक संशोधन होत आहे व मधुमेह, कर्करोग, अल्झायमर अशा रोगांवरही ती गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. हळदीला भारतात तर चांगली मागणी आहेच; पण रंगासाठी तिची निर्यातही होते. हळदीची आंबेहळद ही जात रक्तविकार व त्वचाविकार यांवर औषधी आहे. हळद प्रयोगशाळेत दर्शक म्हणून उपयुक्त आहे. कारण, आम्लामुळे तिला लाल रंग येतो.
हळदीचे रोप साधारणपणे कमरेइतके उंच, कर्दळीसारखी लांबट पाने असणारे असते. पानांनाही हळदीचा छान वास येतो. या पानांमध्ये वाफवून पातोळे नावाचा गोड पदार्थ किंवा इडल्या मुद्दाम बनवितात. ओल्या हळदीचे लोणचे बनवितात. पण, केवळ मीठ, आले व लिंबू यांसह ओल्या हळदीचा कीस जेवताना खाल्ल्यास मुखाचे आरोग्य सुधारते व पचनही सुधारते. भारतातील स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक पदार्थ म्हणून हळदीचे स्थान आहे. हळदीमुळे पदार्थाला सुंदर रंग, चव व स्वाद प्राप्त होतातच; पण आहारात हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिबंधकही आहे. हळदीची लागवड भारतात सर्वत्र होते. महाराष्ट्रात सांगली-मिरज परिसर हळदीचे उत्पादन व व्यापार यांसाठी प्रसिद्ध आहे. मध्यम काळी जमीन हळदीला मानवते. पावसाळ्यापूर्वी तिची लागवड केली जाते. म्हणूनच सप्टेंबरमध्ये हळदीची पाने बाजारात मिळतात व डिसेंबरच्या सुमारास ओली हळद मिळू लागते. पुढे दोन महिन्यांनी हळकुंडे तयार होतात. ती जमीन खणून बाहेर काढतात व स्वच्छ करून पाण्यात शिजवितात. शिजून मऊ झाली, की आठवडाभर उन्हात चांगली वाळवतात. मग रंग येण्यासाठी चोळून, घासून घेतात व कुटून, दळून पावडर करतात. हळदपूड बाजारातून घेताना भेसळीचा धोका असतो. पूर्वी हळकुंडांपासून घरीच पूड केली जात असे. त्यामुळे हा धोका नसे. हळकुंडे विरल सल्फ्यूरिक आम्लात किंवा लिंबाच्या रसात भिजवली, की त्यांना लाल रंग येतो. नंतर पापडखाराच्या पाण्यात शिजवली, की रंग पक्का होतो. अशी हळकुंडे वाळवून, कुटून, दळून कुंकू तयार होते. अजूनही काही गावांमध्ये घरगुती पद्धतीने असे कुंकू तयार करतात. असे कुंकू घातक नाही; पण स्वस्त कृत्रिम रंग कुंकू म्हणून वापरणे अपायकारक आहे.

पारिजातक फुलराणीची कहाणी

पारिजातक  फुलराणी ची कहाणी 


पारिजातकाची फुले अत्यंत सुंदर असतात. त्याचे कारण हा वृक्ष देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक. या वृक्षाच्या नावामागे एक शोकांतिका आहे. बहुधा सुंदर गोष्टींमागे काहीतरी दु:ख असतेच, या समजुतीतून ती निर्माण झाली असावीत. रिजातक एक स्वर्गीय वृक्ष. कारण, अगदी स्पष्ट आहे. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं बाहेर पडली त्यात सुरा आणि हलाहल मिळालं. तसंच लक्ष्मी कौत्सुभ आणि पारिजातकही. हा वृक्ष जन्मला त्या वेळी त्याला सुवर्णकांती होती. त्याच्या पानांना पोवळ्यांचा रंग होता. देवेंद्र या सौंदर्यावर भाळला नसता तरच नवल. देवेंद्राने या वृक्षाला नंदनवनात स्थान दिले.
पारिजातकाची इतरही नाव आहेत - मंदार, रागपुष्पी, नालकुंकूमक, हरिशृंगार आणि शेफालिका, रागपुष्पी आणि नालकुंकूमल या संज्ञा अर्थातच त्याच्या गुलाबी, लाल देठांच्या फुलांमुळे. सौंदर्यवतीला जसं 'बिंबाधरा' असं संबोधलं जातं. त्याप्रमाणे खालच्या ओठाला या फुलाच्या लाल देठाची उपमाही दिली जाते. शेफाली किंवा शेफालिकाचा उल्लेख ऋतुसंहाराच्या तिसर्‍या
सर्गात 'शेफालिका कुसुमगंध मनोहराणि' असा आहे. तो अगदी यथार्थ आहे. कारण, पारिजातकाच्या गंधाचा मोह कुणाला पडणार नाही? मात्र शेफाली किंवा शेफालिका हे नाव बंगालमध्येच अधिक परिचित आहे. पारिजातकाचे एक नाव खरपत्रही आहे. कारण उघड आहे, याची पानं पॉलिश पेपरसारखी खरखरीत असतात. पारिजातक मुख्यत: लागवडीखालीच आहे. फक्त सातपुड्याच्या काही भागात तो वन्यस्थितीत आढळतो, असं म्हणतात. अगदी खडकाळ, रूक्ष जमिनीत वाढणार्‍या, मध्यम उंचीच्या या वृक्षाच्या कोवळ्या फांद्या चौकोनी आणि लवयुक्त असतात. या फांद्यांवर साध्या पानांच्या जोड्या स्वस्तिकार पद्धतीनं मांडलेल्या, पर्णपाते अंडाकृती, दंतुर कडांचे व आधी सांगितल्याप्रमाणे खरखरीत असते.
पारिजातकाचा बहर पावसाळ्यात. रात्री उमलणार्‍या जाई-जुई या फुलांच्या कुळातच पारिजातकाची नोंद आहे. ही सर्वच फुलं पांढरी आणि सुवासिक. निशाचर कीटकांना आनंद यज्ञाचं आमंत्रण गंधाद्वारे मिळतं. अंधारात ही फुलं चांदण्यासारखी उठून दिसतात. पारिजातकाचं वानसशास्त्रीय नाव फारच अगडबंब आहे. निक्टँथस आरबोर ट्रिस्टिस. निक्टँथस म्हणजे चंद्रविकासी, खरं तर निशाविकासी. आरबोर म्हणजे वृक्ष, तर ट्रिस्टीस म्हणजे अश्रू गाळणारा. पारिजातकाची गळणारी फुलं म्हणजे त्याचे अश्रूच. अशी ही कविकल्पना.
फुलांचे गुच्छ फांद्यांच्या टोकाशी येतात. पाकळ्यांची नलिका लाल रंगाची, तर सुट्या भागाचा रंग पांढरा शुभ्र. नलिकेत दडलेले दोन नगण्य पुकेसर आणि लक्षात न येण्याजोगे स्त्रीकेसर. पारिजातकाची फळे पैसा म्हणूनच ओळखली जातात. याचं कारण त्याचे गोलाकार चपटं रूप. पारिजातकाचं फूल अतिशय नाजूक. अगदी थोडा वेळ हातात धरलं तरी कोमेजणारं, उन्हात तर ताबडतोब मलुल होणार. त्याचं कारणही तसंच आहे. 'पारिजाता' नावाची कुण्या एका देशाची राजकन्या होती. सुकुमार आणि नाजुका. ही फुलराणी सूर्यदेवावर भाळली. बालकवींच्या फुलराणीप्रमाणे तिचं सूर्यदेवाशी लग्न लागलं. राजपाट त्यागून ती सूर्यदेवाची सहचारिणी होऊन त्याच्या बरोबर गेली. पण, एकेदिवशी घात झाला. सूर्यदेवानं तिला सोडून दिलं. पारिजातानं दु:खानं जगाचा निरोप घेतला. तिचं दहन केलं त्या ठिकाणी राखेतून एक वृक्ष जन्माला आला. त्याची फुलं म्हणजेच पारिजाताची फुलं. पारिजाता राज कन्येसारखीच अतिशय नाजूक. पण, सूर्यानं केलेला विश्‍वासघात पारिजाता अजूनही विसरलेली नाही. ही फुलं सूर्य मावळल्यावर उमलतात आणि सूर्य उगवल्यावर गळून पडतात, उन्हानं कोमेजून जातात.

विजया दशमी आणि आपटाची पानं

विजया दशमी आणि आपटाची  पानं



भारतीय संस्कतीचे वैशिष्ट्य आहे, की त्यात पक्षी प्राणी यांच्याबरोबरच नदीनाले, डोंगरदर्‍या व वृक्षवनस्पती यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्याशी संबधित कथांमधून बोधामृतच दिले गेले आहे. आपट्याचा वृक्षही याला अपवाद नाही. पट्याच्या शेंगा जशा खाण्याजोग्या, तशाच रक्तकांचनाच्या शेंगाही. उत्तर भारतात याच्या ओल्या बिया आमटीत आणि दह्यातही घालतात. त्यामुळे दोन्ही पदार्थांची लज्जत वाढते, असं खुशवंत सिंगांनी आपल्या एका लेखात म्हटलं आहे.
विजया दशमीला सोनं लुटण्याच्या परंपरेला पार्श्‍वभूमी आहे ती अशी, वरतंतू नावाच्या मुनींचा कौत्स नावाचा शिष्य होता. गुरूगृही राहून त्यानं विद्याभ्यास पूर्ण केला आणि गुरूजींना दक्षिणे विषयी विचारलं. शिष्यावर गुरूजी खूष होते. त्यांनी 'दक्षिणा नको' असं कौत्साला सांगितलं. कौत्साने वारंवार विनंती केल्यावर वरतंतू मुनींनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा दक्षिणा सांगितली. कौत्स सुवर्णमुद्रा मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुनं नुकताच एक मोठा यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान केली होती. कौत्साला भेटण्यासाठी तो आला तो मृत्तिकापात्रे घेऊन कौत्साची पूजा करण्यासाठी.
कौत्साला आता प्रश्न पडला की रघुराजा चौदा कोटी सुवर्णमुद्रा कशा देणार? पण राजाने पुन: पुन्हा विनंती केल्यावर कौत्साने त्याच्याकडे सुवर्णमुद्रा मागण्याचं धाडसं केलं. राजानं त्याला दुसर्‍या दिवशी येण्याचं सांगितलं. कौत्स गेल्यावर रघुराजानं सेनापतीला बोलावून कुबेर म्हणजे संपत्तीचा स्वामी त्यावर चढाई करण्याची आज्ञा केली. ही चढाई दुसर्‍या दिवशी करायची होती. हे वृत्त ऐकताच कुबेर घाबरला. त्यानं रघुराजाच्या कोषावर रात्रीच सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला,
दुसर्‍या दिवशी कौत्स आला. राजानं त्याला कुबेराकडून आलेल्या सर्व मुद्रा दान केल्या. त्या चौदाकोटी पेक्षा जास्त होत्या. कौत्स म्हणाला, मला चौदा कोटीपेक्षा अधिक मुद्रा नकोत. तुम्ही जास्तीच्या मुद्रा परत घ्या. रघुराजा म्हणाला, एकदा दिलेलं दान मी परत घेत नाही.
अखेर जास्तीच्या मुद्रा एका वृक्षाखाली ठेवल्या आणि प्रजाजनांनी त्या लुटल्या. ज्या दिवशी हे घडलं तो दिवस होता विजया दशमी आणि वृक्ष होता आपटा.
आताच्या काळात आपट्याखाली सुवर्णमुद्रा कोण ठेवणार? मग लोकं आपट्याचं पानंच घेतात आणि एकमेकांना देतात प्राचीन भारतात सोन्याच्या धूर निघत असे, अशी वदंता होती. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे यांचे या सोन्याच्या धुरांवर सुरेख विनोदी भाष्य आहे. 
आपट्याची पानं विड्या वळण्यासाठी वापरतात. आदल्या दिवशी म्हणजे दुसर्‍याला वाटलेली सोन्याची पानं दुसर्‍या दिवशी विड्या वळण्यासाठी वापरायची, म्हणजे झाला सोन्याचा धूर !

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia

वेदनामुक्तीची जादू : अँनेस्थेशिया Anesthesia 

काही शतकांमध्ये शल्यक्रियाशास्त्राची प्रगती विलक्षण झपाट्याने झाली. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. शस्त्रक्रियेत आणि शस्त्रक्रियेनंतर होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे विविध उपाय अमलात आणले जाऊ लागले. शरीरक्रियाशास्त्रासारख्या पायाभूत वैद्यकीय शास्त्रशाखांमधील प्रगतीमुळे शरीरातील विविध क्रियांमधील शास्त्रीय तत्त्वे, कारणमीमांसा, आपापसांतील ताळमेळ, होणारे बदल अशा विविध बाबींचे अधिकाधिक सूक्ष्म आकलन होऊ लागले. केवळ शरीररचना पहिल्यासारखी सामान्य करणे हे शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट नसून, शारीरिक क्रिया शक्य तितकी सामान्य आणि नैसर्गिक करणे, हे शस्त्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट असते. विविध तंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास, विविध उपकरणांची मदत ही बाब या प्रगतीला साहाय्यभूत ठरली. पण, या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारण ठरले बधिरीकरणशास्त्र वा अँनेस्थेशियालॉजीतील प्रगती. सर्जरीच्या सुरुवातीची एबीसीच मुळी 'ए फॉर अँनेस्थेशिया'ने होते म्हणा ना.
कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे काही विशिष्ट विकार बरा करण्यासाठी, विशिष्ट व्याधींवर उपचार करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तंत्राने केलेली जखम. ही जखम बाहेरून दिसणारी असेल अथवा न दिसणारीही असू शकेल. अेंडोस्कोपच्या मदतीने केल्या जाणार्‍या अनेक शस्त्रक्रियांमध्ये बाहेरून कोणतीच जखम नसते वा आत केलेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत बाहेरील जखम नगण्य असते. पण, जखम लहान असो वा मोठी, बाहेरून दिसो वा न दिसो, जखम म्हटली की वेदना आलीच. शुद्धीवर असलेला आणि वेदनेची जाणीव न गमावलेला सामान्य माणूस शस्त्रक्रियेची वेदना कशी सहन करणार? म्हणूनच शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवू नयेत, यासाठी विविध पद्धती अँनेस्थेशियाच्या शास्त्रात विकसित होत गेल्या.
आधुनिक वैद्यकाच्या विकासापूर्वी रुग्णाच्या मस्तकावर प्रहार करून त्याला बेशुद्ध करणे, रुग्णाला विविध मादक द्रव्ये देणे, त्याला बांधून अथवा इतरांनी आवळून धरून निपचित पाडणे अशा उपायांचा उल्लेख होतो. आधुनिक वैद्यकाच्या विकासात वेदनेच्या मार्गाचे जसजसे अधिकाधिक आकलन होत गेले, तसतसा विविध औषधांचा बधिरीकरणासाठी उपयोग करण्यात येऊ लागला.
शस्त्रक्रिया ही त्वचेलगतच्या भागामध्ये असेल, तुलनेने त्यात कमी आकाराचा छेद घ्यावा लागणार असेल, कमी काळाची असेल, तर तेवढय़ाच भागातील मज्जातंतूच्या शाखा इंजेक्शनद्वारे औषध त्या भागात टोकून बधिर करण्यात येतात. काही वेळा तर अतिशीत पदार्थांच्या फवार्‍याने फक्त मज्जातंतूची टोके तात्पुरती बधिर करूनही शस्त्रक्रिया केली जाते. यापुढचा भाग म्हणजे काही ठळक मज्जातंतूचे शरीरातील स्थान लक्षात घेऊन अथवा मज्जारजूच्या पातळीप्रमाणे शरीरातील विशिष्ट पातळीवरील रचना लक्षात घेऊन, त्यानुसार तो भाग वा त्या पातळीपर्यंतचा शरीराचा भाग बधिर केला जातो.
यानंतरचा भाग अर्थातच रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध करणे, यासाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात. या प्रकारात अधिकाधिक सुरक्षा आणण्यासाठी सतत नव्या औषधांसाठी, नव्या तंत्रासाठी संशोधन चालूच असते.
र्मयादित काळासाठी वेदनेपासून मुक्ती देणारे अँनेस्थेशियाचे शास्त्र आधुनिक वैद्यकातील आणि शस्त्रक्रियाशास्त्रातील एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे.

Japanese Encephalitis एनसिफलायटिस

Japanese Encephalitis एनसिफलायटिस 

Japanese Encephalitis एनसिफलायटिस
दिवसेंदिवस नवनवीन आजारांमध्ये भर पडत असून, त्यांची व्याप्ती वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये एनसिफलायटिस या आजाराने थैमान घातले असून, या आजारामुळे नुकतेच आणखी १0 बळी गेले आहेत.. • भारताच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बातमी अशी, की पूर्णपणे स्वदेशी बनावटीची, भारतात आढळणार्‍या विषाणूंच्या वापराने बनवलेली लस तयार करण्यात आली आहे. तिला नुकतीच सरकारी पातळीवर मान्यता मिळाली असून ती सुरक्षित आहे. त्यामुळे JEV चे उच्चाटन आता दूर नाही! रखपूर जिल्ह्यामध्ये ज्या आजाराच्या साथीने सध्या जोर धरला आहे आणि रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळवले आहे, तो आजार म्हणजे ज्ॉपनीज एनसिफलायटिस (Japanese Encephaltis) यालाच पूर्वी Japanese B Encephalitis असे म्हणत असत.
यामधील विषाणुजन्य मेंदूदाहाच्या कारणांमध्ये JEV हा एक महत्त्वाचा विषाणू आहे. कारण, दर वर्षी ३0 ते ५0 हजार लोक याची शिकार होतात. आजारी व्यक्तीचे वय, भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार ३ ते ६0 टक्के पर्यंत लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात.
सहसा शहरी भागांमध्ये हा आजार होत नाही. भातशेतीची खाचरे पाण्याने भरली, की डासांची उत्पत्ती वाढते. अशा वेळी डास त्यांचे नेहमीचे खाद्य (डुक्कर, पक्षी) बदलतात आणि माणसांना चावायला सुरुवात करतात. डुकरांना हा जंतुसंसर्ग झाला, तरी ते सहसा दगावत नाहीत.
JEV चा विषाणू डासामार्फत मनुष्याच्या शरीरात शिरल्यावर सुरुवातीला ५ ते १५ दिवसांपर्यंत कोणत्याच स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत नाहीत. यामध्ये साधारण २५0 लोकांना या विषाणूची लागण झाली, तरी फक्त एकालाच आजार होतो.
थंडी वाजून हुडहुडी भरणे ही पहिली अवस्था असते. कालांतराने प्रचंड प्रमाणात ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि इतर अनेक तक्रारींची सुरुवात होते. त्यानंतर १ ते ६ दिवसांत मानेचा कणा कडक होणे, लकवा भरणे, भूक न लागणे, फिट्स येणे, परिस्थितीचे भान जाणे, बेशुद्धावस्था अशा तक्रारी वाढतात. साथीच्या तीव्रतेनुसार मृत्यूचे प्रमाण कमी- अधिक होते. पण, मुलांमध्ये ते खूपच अधिक प्रमाणात असते. जे रोगी यातून बचावतात, त्यांमध्येसुद्धा मेंदू व चेतासंस्थेशी निगडित बहिरेपणा, भावनिक असंतुलन, लकवा अशा तक्रारी दीर्घकाळ राहतात. काही जणांत ताप, उलट्या, डोकेदुखी, वृषणाला सूजही दीर्घकाळ राहते.
श्‍वसनाला त्रास होणे टाळणे, फिट्स येऊ न देणे व आहाराची काळजी घेणे यांबरोबरच योग्य ती शुश्रुषा इतकेच करता येते. शरीरात विषाणूंची संख्या रोखण्यासाठी वेगवेगळी प्रतिजैविके वापरून पाहिली असली, तरी त्यास अद्याप फारसे यश आलेले नाही. एका रोग्याकडून दुसर्‍यास हा आजार होऊ शकत नसल्याने रोग्यास वेगळे काढण्याची आवश्यकता नाही.
पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालणे, डासांना पळवून लावणारी मलमे अंगावर लावणे, मच्छरदाण्यांचा उपयोग करणे हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
JEV मुळे प्रतिकारशक्ती जन्मभरासाठी येते. म्हणजे JEV चा एकदा संसर्ग झाला, तर पुन्हा आजार सहसा होत नाही. त्यामुळेच लसीकरण हा त्यावरचा १00 टक्के उपाय आहे; परंतु ती मोठय़ा प्रमाणात परवडण्यासारखी नाही.चीन, कोरिया, जपान, तैवान, थायलंड येथे मोठमोठय़ा प्रमाणात साथी आल्या. पण, लसीकरणामुळे तेथे लवकरच आवर घालता आला. भारत, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम येथेही अधूनमधून साथी उफाळून येतात आणि मनुष्यहानी होते.
(लेखक पुणे इंडियन मेडिकल असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, बालरोगतज्ज्ञ आहेत.) • हा आजार हेरॉनसारख्या पक्ष्यांमध्ये व डुकरामध्ये असलेल्या विषाणूंमधून क्युलेक्स जातीच्या डासांमार्फत पसरतो. दक्षिणपूर्व आशिया आणि अतिपूर्वेच्या देशांमध्ये हा आजार पसरला आहे.

पत्थरचाट मासा - Catfish

पत्थरचाट मासा - Catfish

कॅटफीश प्रकारातलाच मासा आहे. त्याचे नाव त्याच्या वैशिष्ट्यावरून पडले आहे. पत्थरचाट हा मासा पुण्यातील नद्यांमध्ये सापडत होता, हा आता इतिहास झाला आहे. तेव्हा खडकवासला किंवा मुळशी ही धरणे अस्तित्वातही नव्हती आणि नद्याही आजच्यासारख्या पुणे शहराचे सांडपाणी वाहणारे नाले नव्हत्या, तर खूपच चांगल्या आणि मोठय़ा होत्या. त्यांची पात्रे विस्तृत होती. त्यामुळे या नद्यांमध्ये पूर्वी मासे आढळत असत. पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला, तरी हा मासा दगडांना, खडकांना घट्ट चिकटून राहतो; म्हणूनच त्याचे असे नाव पडले आहे.
याचा आकारही इतर माशांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या पुढील मोठय़ा दोन मिशा मुळांशी जाड्या आणि पुढे निमुळत्या होत गेल्यामुळे त्यांचा आकार माती खोदण्याच्या टिकावासारखा दिसतो. दुसर्‍या दोन मिशा नाकपुडीसमोरून शिंगासारख्या वर दिसतात. छातीकडील भाग हा जणू काही शिल्प कोरल्यासारखा विशिष्ट चौकोनी आकाराचा दिसतो आणि त्यावर छोटे-छोटे खूपसे टेंगूळ दिसतात. याच्याच साहाय्याने तो दगडाला किंवा खडकाला घट्ट चिकटून राहतो.
या माशांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तोंडाचा जबडा अत्यंत रुंद आणि मोठा, डोळे मात्र तुलनेने खूपच छोटे. छाती आणि पोटाजवळील पंख खालून पाहिले, तर एक सपाट पृष्ठभाग होईल, अशी रचना आहे. या माशाच्या पंखांची रचना ही खूप जाडसर वाटते आणि त्याच्या खालील भागात भरपूर मेद असावे, असे फुगीर दिसतात. शरीराच्या वरच्या भागातील दुसरा छोटासा पंखासारखा आकार हा पूर्णपणे मेदयुक्त असतो. १0 ते २५ सेंमी लांब वाढ होणारा हा मासा तांबूस ते काळसर रंगाचा असतो.
त्याची वीण वर्षातून एकदाच पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होत असते. मादी एका वेळी १५00 ते ७000 पर्यंत अंडी देते. माशांचे वजन, लांबी, वय आणि पर्यावरणातील पोषक बाबींवर याची पुनरुत्पादन क्षमता अवलंबून असते. तर मादीचे प्रमाण साधारणपणे एकास एक असे असते. या माशाविषयीची विशेष जीवशास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. शिवाय तो खूपच कमी प्रमाणात मिळतो. यावरून त्याचे अस्तित्व धोक्याच्या पातळीवर आहे, हे स्पष्टपणे जाणवते. अभ्यासासाठी म्हणून याचे सरंक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.

कीटकांचे स्वसंरक्षणतंत्र | Protection Technics of Insects

कीटकांचे स्वसंरक्षणतंत्र | Protection Technics of Insects 


संरक्षणासाठी कीटक सर्वसामान्य उपायांबरोबर इतर अनेक युक्त्या, प्रयुक्त्या योजतात. फुलपाखरे, पतंग यांना पंख असतात. उडण्यामध्ये ते अतिशय कुशल असतात. शत्रूची चाहूल लागताच त्यांच्यापैकी बहुतेक जण साहजिकपणे पंखांवर स्वार होऊन पळून जातात. नाकतोडे, टोळ, रातकिडे यांसारखे सडपातळ पाय असणारे कीटक पंख असले, तरी पहिल्या प्रथम, शत्रूच्या हल्ला करण्याच्या संभाव्य मार्गातून टुणकन उडी मारून बाजूला होतात आणि नंतर जरुर वाटली तर उडून जातात. झुरळासारखे कीटक, पंख असले, तरी उडत नाहीत. शत्रूच्या हल्ल्याची जाणीव होताच वेगाने पळून जातात. हे बहुधा प्रत्येकाने अनुभवले आहे.
काही भुंगेरे (उदा. पेंगूळ वत्सला, रूपाली) पंखहीन असतात. त्यांना उडताही येत नाही, की पळताही येत नाही. ते शत्रूची चाहूल लागली, की असतील तेथे दडतात. जराही हालचाल न करता मेल्यासारखे पडून राहतात. एलिओडेस नावाचा भुंगेरा डोके जमिनीत खुपसतो आणि राहिलेले शरीर जमिनीस ९0 अंश कोनात ताठ सरळ करून शत्रू आहे तोपर्यंत तसाच ताटकळत उभा राहतो. ही असली ध्यानं शत्रूच्या लक्षात येत नाहीत. शत्रूला शिकार सापडत नाही. काही नाकतोडे, काही फुलपाखरे, काही भुंगेरे यांचा रंग ते जेथे साधारणपणे वावरतात, तेथील रंगांशी मिळता-जुळता असतो. त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाहीत आणि शत्रूच्या तावडीतून सुटतात. असे कीटक बहुधा पाली, सरडे, बेडूक, पक्षी यांचे खाद्य असते. विस्टॉन ब्युटेलारिया हा एका जातीचा पतंग इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम परिसराचा रहिवासी आहे. त्याच्या वंशजांचा रंग तेथील वातावरणास साजेल असा फिक्कट पांढरा होता. परंतु, तेथे जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि गिरण्यांची धुराडी काळा धूर ओकू लागली, तेव्हा पांढर्‍या रंगाचे हे पतंग शिकारी पक्ष्यांच्या दृष्टीस सहज पडत असत. हे टाळून स्वत:चा जीव बचावण्यासाठी या पतंगांनी आपला रंग बदलला, काळसर केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुसर्‍या काही पतंगांनी आपल्या रंगातच नव्हे, तर रूपातही बदल केला. काही नाकतोड्यांसारखे दिसू लागले, तर काहींनी आपल्या पंखावरील रंगीबेरंगी खवल्यांना रजा दिली आणि मधमाशी किंवा गांधिलमाश्यांच्या पंखासारखे पारदश्री आणि पातळ बनविले. यात त्यांना उत्क्रांतीची साथ लाभली, यात शंका नाही. अशीच साथ आणखी एका पतंगाला लाभली. त्याचे रूप बदलले नाही; पण पंख मात्र दगड फुलासारखे दिसू लागले. दुर्गंध भुंगेरे कुलातील भुंगेर्‍यांच्या स्रावक ग्रंथींच्या स्रावाला दुर्गंध येतो. हा स्राव कातडीवर पडला, तर कातडीला फोड येतात. कातडी चुरचुरते. या कुलात बॉम्बफोड्या नावाचा भुंगेरा शत्रू जवळ आला, की बॉम्बच्या स्फोटासारखा आवाज करतो आणि दुर्गंधी स्राव एखाद्या पाण्याच्या जोरदार झोताप्रमाणे बाहेर सोडतो. शत्रूला शिकार सोडणे आणि पळून जाणे भाग पडते. मधमाश्या, गांधिलमाश्या आणि लाल मुंग्या स्वत:चे, आपल्या वसाहतीचे संरक्षण कसे करतात, हे नव्याने सांगायला नको.
कीटकांच्या स्वसंरक्षणाच्या या युक्त्या, प्रयुक्त्यांबाबत सांगावे तेवढे थोडेच आहे. 


पाण्याखाली छायाचित्रण Water Photography

पाण्याखाली छायाचित्रण Water Photography



पाण्याखाली छायाचित्रण करण्यासाठी ध्वनिलहरींचा उपयोग ही कल्पना नवी होती. डॉल्फिन पाण्यातील त्यांचे भक्ष्य शोधताना जी पद्धत वापरतात, तीच अधिक विकसित करून पाण्याखाली चित्रणकरणारा कॅमेरा तयार झाला निलहरींचा उपयोग व त्यावरील संशोधन सातत्याने होत असल्याचं आपण पहात आहोत. परदेशातही बहुसंख्य संशोधन गट यावर कार्यरत आहेत. त्यातील ध्वनीलहरींच्या साहाय्याने होणार्‍या समुद्रविषयक अथवा पाण्याखालील अभ्यासातूनच जलमय आकाश ही कल्पना निर्माण झाली. ही कल्पना म्हणजेध्वनींच्या सहाय्याने समुद्राचं आतील जग हे मंदप्रकाशित होते. या लहरी पृष्ठभागावर ध्वनीक्षेपित होऊन स्थिर आणि मोठा आवाज निर्माण होतो. त्यामुळे समुद्राच्या तळातील शांतता भंग होते. 
हीच गोष्ट ध्वनी विज्ञानातील तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांनाही व्याकुळ करून गेली. यासाठी शास्त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी आपलं कौशल्य पणाला लावून त्यातून काही संकेत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला समुद्रतळातील गोष्टींचा वेध घेण्याचे साधन असे म्हणावे लागेल.
मायकेल बकिंगहॅम या शास्त्रज्ञाने १0 वर्षांपूर्वी निरूपयोगी ध्वनीविषयाची विचार केला आणि त्याला असे आढळून आले, की यात काहीतरी महत्वाचं वाया जात आहे. 'ही एक क्षुद्र कल्पना आहे, असे माझ्या डोक्यात येऊन गेले' हे उद्गार, इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ आणि आताचे समुद्रविषयक ध्वनीविज्ञानाचे प्राध्यापक व स्क्रिप्स इन्स्टिटयुट ऑफ ओसिएनोग्राफी (Scripps institute of oceanography) कॅलिफोर्निया बकींगहॅम यांचे होते. रूपयातून एक आणा सापडल्याचा आनंद त्यांना झाला. त्यांनी स्वत:लाच प्रश्न केला.
आपण जसा प्रकाशाचा फोटोग्राफीत उपयोग करतो तसाच समुद्रात का करू नये? ध्वनीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून बकींगहॅम यांना असे जाणवले की, समुद्राचा पृष्ठभाग हा लागोपाठ सूर्यप्रकाशित दृष्टिकोनातून बकींगहॅम यांना असे जाणवले, की समुद्राचा पृष्ठभाग हा सूर्यप्रकाशित आकाशाचं अनुकरण करतो. हेच ध्वनीचं अविच्छन विशाल उगमस्थान आहे. यालाच बकींगहॅम 'ध्वनिविज्ञान सूर्यप्रकाश' (Acoustic day light) असे म्हणतात. आपल्या परंपरागत तंत्रज्ञानानुसार पाण्यातील एखाद्या वस्तूच्या शोधासाठी अंधारातील शूटिंग फोटोग्राफीचा वापर करतात. एखादी कोलाहल करणारी वस्तू सहज ऐकू येते म्हणून आपण शोधू शकतो. त्यासारखेच एखाद्या कॅमेर्‍याचे शटर उघडे ठेवले तर तो कॅमेरा सहजपणे कुठलाही प्रकाश कॅच करतो. दुसरे म्हणजे शांत, स्थिर किंवा अचल वस्तू (Traget) सुद्धा एखाद्या चंचल भागामध्ये ध्वनी उत्पन्न करते. पण आजपर्यंत कुणीही ध्वनीसूर्यप्रकाशात छायाचित्र घेईल, असा कॅमेरा बनविण्याचा विचार केलेला नाही.
१९९२ मध्ये बकींगहॅम व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून ध्वनीविज्ञान अथवा ध्वनीशास्त्र कॅमेरा (Acoustic camera) बनविण्याचं श्रेय मिळविले. अडीच वर्षानंतर त्यांनी अँडॉनीस, अँकॉस्टीक डेलाइट ओसिएन नॉइज इमेजिंग सिस्टीम (ADONIS) बनविली. अँडॉनीस पाण्याच्या आतील छायाचित्रण करण्याचं काम करू लागला.  
बॅकींगहॅमच्या सहकार्‍यांनी अँडॉनीस ही पद्धत ऑरकाटँक (Orca Tank) या समुद्राजवळील ठिकाणी फिरत्या यंत्रणेवर (Moving Tragets) बसवली आणि त्याच पद्धतीने अँडॉनीस स्कॅन केला. यात बरेच महत्वाचे परिणाम त्यांना मिळाले. यामुळे काही जीवनशास्त्रज्ञांना शंका आली की, काही सस्तन प्राणी हे ध्वनीशास्त्र, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने माग काढीत आपली शिकार अथवा भक्ष्य शोधतात. उदा. ब्लाइंड फोल्डेड डॉल्फिन (Blind folded Dolphin)
पाण्याखालील कॅमेर्‍यांचा वापर मुख्यत्वे समुद्रातील बेटांची प्रवेशद्वारे, पाणी शोधण्यासाठी किंवा किनार्‍यापासून दूर अंतरावरील तेल विहिरींची तपासणी इत्यादीसाठी होईल. ध्वनीशास्त्र सूर्यप्रकाश पद्धत ही खरोखरच खूप महत्वाची असून पाण्याखालील अथवा समुद्रातील जग व त्यातील रहस्ये उलगडायला निश्‍चितच उपयोगात येईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. 

Photosynthesis प्रकाश संश्लेषण

Photosynthesis  प्रकाश संश्लेषण



वनस्पती प्रकाशात ऑक्सिजन बाहेर टाकत असतात, तर अंधारात कार्बन डायऑक्साईड. सजीवांसाठी महत्त्वाच्या असलेला ऑक्सिजन बाहेर टाकण्याचे प्रमाण यात अधिक आहे. 
Photosynthesis  प्रकाश संश्लेषण

व्हा एखादा सेकंद आपला श्‍वास कोंडल्यामुळे जीव गुदमरतो, त्यावेळी आपल्याला निसर्गातून मोफत उपलब्ध होणार्‍या प्राणवायूचे म्हणजेच ऑक्सिजनचे अस्तित्व न दर्शविणार्‍या या वायूचे महत्त्व पटते. सर्व सजीवांना आवश्यक असलेला हा प्राणवायू कसा निर्माण होतो, आणि वनस्पतींच्या वाढीसाठी प्रकाश संश्लेषण किती आवश्यक असते, या संदर्भात अनेक संशोधक कार्यरत होते, तरी त्यापैकी फक्तपाच संशोधकांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. परंतु, या संदर्भातील संशोधनाचे श्रेय डच शास्त्रज्ञ ज्ॉन इन्जेन हाऊझ यांना जाते.
१६४३ मध्ये जॉन बॉप्टीस्टा व्हॅन हेलमोट या शास्त्रज्ञाने वनस्पतीची वाढ ही केवळ मातीतून मिळणार्‍या घटकांमुळे न होता त्यांच्या वाढीसाठी पाण्यातील घटकांचीही तेवढीच आवश्यकता असते, असा निष्कर्ष जैविक प्रयोगाच्या आधारे काढला. त्यानंतर तब्बल १२५ वर्षांनंतर १७७0 मध्ये जोसेफ प्रिस्टली हे वनस्पतीवर काही प्रयोग करीत असताना, त्यांनी एका वनस्पतीवर काचेचा चंबू उपडा ठेवला, त्यावेळी चुकून त्या चंबूमध्ये मेणबत्ती राहिली. त्यावेळी चंबूमधली मेणबत्ती नेहमीपेक्षा जास्त प्रकाशमान झाल्याचे आढळले. यावरून वनस्पती प्रकाशात असताना ऑक्सिजन बाहेर टाकतात, असा निष्कर्ष काढला.
त्यानंतर शरीरशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे अभ्यासक आणि राजवैद्य असलेले इन्जेन हाऊझ यांनी जोसेफ प्रिस्टली यांचे 'वनस्पतीतील वायुशोषण' या विषयावरील संशोधन अभ्यासले. त्यातून त्यांची वनस्पतीतील वायूंचे शोषण कसे होते, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यानंतर त्या उत्सुकतेतून अनेक प्रयोग केले. प्रकाशामध्ये वनस्पती हिरव्या पानांच्याद्वारे बुडबुड्यांच्या रूपात विशिष्ट प्रकारचे वायू बाहेर सोडतात, तर अंधारात क्रिया थांबते, असे त्यांच्या लक्षात आले. या शोधानंतर अनेक प्रयोगानंतर प्रकाशात वनस्पतीतून बाहेर पडणारा वायू हा ऑक्सिजन तर अंधारात बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो व वनस्पतींतून बाहेर पडणार्‍या ऑक्सिजनचे प्रमाण कार्बन डायऑक्साइडपेक्षा अधिक असतो, असा त्यांनी निष्कर्ष काढला. वनस्पतीची वाढ ही फक्त जमिनीतील विविध घटकांमुळेच होत नसून हवेतील किंवा प्रकाशातील घटकही त्याला कारणीभूत असतात, असेही त्यांनी सिद्ध केले. वनस्पतींच्या हिरव्या पानांतील हरितद्रव्यामुळे प्रकाशऊज्रेचे रूपांतर रासायनिक ऊज्रेमधे (सुक्रोज व फ्रुक्टोज) होते. व ती ऊर्जा वनस्पतीमध्ये साठविली जाते, या प्रक्रियेला 'प्रकाश संश्लेषण 'असे म्हणतात. इन्जेन हाऊझ १७८५ मध्ये त्यांनी अल्कोहलच्या पृष्ठभागावर असलेल्या कोळशाच्या कणांची अनियमित हालचाल कशामुळे होते, यावर संशोधन केले. इन्जेन हाऊझ रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १७७९ मध्ये निवडून आले. त्याचवर्षी त्यांचे निधन झाले.

किरणोत्सर्गापासून Radioactivity

किरणोत्सर्गापासून Radioactivity 



किरणोत्सर्गापासून होणारी हानी महाभयंकर असली, तरी काही विधायक कामांसाठीही किरणांचा उपयोग होत असल्याने अनेकांना त्या क्षेत्रात काम करावे लागते. त्यांच्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करून किती प्रमाणातील किरणांचा मारा मानवी शरीराची हानी करू शकतो हे ठरवले. नवी शरीर किती प्रमाणात किरणांचा मारा सहन करू शकते या विषयावर शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे. या उपलब्ध माहितीच्या आधारे १९३४ मध्ये इंटरनॅशनल रेडिओलॉजिकल प्रोटेक्शन क्ष किरणे किंवा गॅमा किरण यांसारख्या स्रोतांच्या सान्निध्यात काम करणारे लोक जास्तीत जास्त 0.२ रॉटगेन (प्रारणांची पातळी दर्शविणारे एकक) एवढा किरणांचा मारा सहन करू शकतात असे ठरविले. प्रतिदिवस एवढा मारा सहन केला, तर कुठलीही इजा मानवी शरीरास होत नाही, असा निष्कर्ष काढला गेला. पण १९३६ मध्ये मानवी शरीरास सहन करण्याजोग्या किरणांचा मारा जास्तीत जास्त 0.१ रॉटगेन प्रतिदिवस एवढा कमी करण्यात आला. १९४९ पर्यंत हेच प्रमाण गृहीत धरण्यात आले होते. या दरम्यानच्या काळात अणुशक्ती केंद्राने पुढाकार घेऊन दुसर्‍या महायुद्धात या घातक अणुकिरणांना बळी पडलेल्यांना प्राधान्य देऊन, शास्त्रज्ञांना नव्याने संशोधन करण्यास भाग पाडले. या संशोधनाची परिणती म्हणजे मानवी शरीरास चालण्याजोगा किरणांचा मारा 0.३ रेम (शोषित प्रारणांचे एकक) प्रतिआठवड्यावर येऊन स्थिर झाला. शास्त्रज्ञांनी ही शिफारस १९५६ मध्ये पुन्हा बदलली व किरणांचा मारा हा प्रतिवर्षाला ५ रेमपेक्षा जास्त वाढता कामा नये असे ठरवले. या संदर्भात १९६0 मध्ये संपूर्ण रेडिएशन प्रोटेक्शनबद्दल परीक्षण करून यू.एस. फेडरल रेडिएशन काऊन्सीलने त्यांचा अहवाल रेडिएशन प्रोटेक्शन गाईड म्हणून प्रकाशित केला व जेथे किरणांचा स्रोत, क्षेत्र आहेत, अशा प्रयोगशाळांमध्ये तो ठेवला. या मागचा हेतू असा, की कोणीही मानवी शरीरास किरणांचा मारा किती चालण्याजोगा आहे, यासंदर्भात चुकीची माहिती देऊ नये असा होता. याच मार्गदर्शिकेच्या आधारावर जे लोक किरणांच्या सान्निध्यात अथवा स्रोतामध्ये काम करीत नाही, त्यांच्यासाठी किरणांची सुरक्षित र्मयादा 0.५ रेम एवढी ठरवली आहे.
यानंतर अधिक संशोधन करून शास्त्रज्ञांनी मानवी शरीराच्या विविध अवयव व इंद्रियांसाठी किरणांची सुरक्षित र्मयादा काढली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या इंद्रियांसाठी असलेली किरणांची सुरक्षित र्मयादा आंतरराष्ट्रीय समितीने नमूद केलेली आहे. यात अस्थीमज्जा, डोळ्यांची बुबुळे, रक्तपेशी, जनन प्रपिंड यांना ३ रेम, शरीराच्या सर्व त्वचेला ३0 रेम, हात, पाय, बाहू, पायाच्या घोट्याला १५ रेम, इतर इंद्रियांना १५ रेम, मानवाच्या पूर्ण शरीरास 0.५ रेम आणि प्रजनन संस्थेस सरासरी ५ रेम याप्रमाणे र्मयादा ठरवण्यात आली आहे.
तीव्र प्रमाणात असणारा किरणांचा मारा मानवी शरीराला अपाय करतो, हेही शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. या प्रकाराचा तीव्र मारा अणुबॉम्ब उत्पातात किंवा अणुकेंद्राच्या अपघातात होणे शक्य आहे.

मुंग्यांचा शेजारधर्म वारुळे

मुंग्यांचा शेजारधर्म वारुळे


मुंग्यांचा शेजारधर्म हा मदत करण्याचा शेजारधर्म नाही, तर स्वार्थावर आधारलेला आहे. एकाच जातीच्या मुंग्यांची वारूळे शेजारीशेजारी नसतात, हेही त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्यांच्या वसाहतींनी (वारुळे) बराच मोठा प्रदेश व्यापल्यावर त्यांची वारुळे एकमेकांजवळ अगदी शेजारी शेजारी असतात. अशा दोन किंवा अधिक वसाहती जवळजवळ असल्यावरच त्यांच्यातील शेजारधर्माचे (!) स्वरूप प्रजाती वा जातीनुरूप भिन्न भिन्न असते.
साधारणपणे एकाच जातीच्या मुंग्यांच्या वसाहती शेजारी शेजारी स्थापित झाल्याचे आढळत नाही. शेजारी शेजारी स्थापित झालेल्या वसाहती वेगवेगळ्या जाती-प्रजातींच्या असतात. त्या वसाहतीतील एकमेकांत मिसळणे अपरिहार्य असते. त्याचे स्वरूप वेधक असते. मानवाच्या वृत्ती-प्रवृत्तींचे ते जणू प्रतिबिंब वाटते.
शेजारी शेजारी असणार्‍या दोन वसाहती आतून बोगद्यांनी जोडल्या जातात. त्यातील मुंग्या अगणित असल्या तरी एकमेकींच्या वसाहतीत जात नाहीत. 'आपण बर्‍या आपल्या वसाहती बर्‍या' अशा रीतीने त्यांचे व्यवहार चालू राहतात. असा शेजार, 'आत्मकेंद्री शेजार' आहे, असे म्हणावेसे वाटते.
काही जातींच्या वसाहतींच्या भिंती आश्‍चर्यजनकरीत्या सामाईक असतात. काही आघात होऊन या भिंती कोसळल्या, तर त्यातील दोन वेगळ्या जातींच्या मुंग्यांचा अपरिहार्यपणे एकमेकांशी संबंध येतो. मग त्या एकमेकींच्या बाजूच्या अंडी, अळ्या, कोश याची पळवापळव करतात आणि शहाजोगपणे 'तुम्ही कोण व आम्ही कोण' ही वृत्ती धारण केल्यासारख्या स्वतंत्रपणे राहतात. असा शेजार हा 'पेंढारी शेजार' होय.
सोलेनॉप्सिस प्रजातीतील फ्युगॅक्स जातीच्या मुंग्या आकाराने आणि सार्मथ्याने जेमतेम असतात. त्या आपल्या वसाहती कॉम्पोनोट्स प्रजातीतील आकाराने आणि शक्तीने जबरदस्त असलेल्या मुंग्यांच्या वसाहती शेजारी स्थापन करतात. वृत्तीने डामरट असणार्‍या या मुंग्या चपळतेने हालचाली करतात. कॉम्पोनोट्सच्या रक्षक मुंग्यांना गुंगारा देत, त्या कॉम्पोनोट्स मुंग्यांच्या वसाहतीत जातात. तेथील अंडी, अळ्यांचा शोध घेतात आणि त्यावर आपली पोटपूजा साजरी करतात. अशा शेजारधर्माला 'चौर्यकर्मी' म्हणणे शोभून दिसते.
क्रिमॅटोगॅस्टर लिमाटा पॅराबायोटिका जातीच्या मुंग्या आणि मोनॅसिक डॅबिलीस या मुंग्या एकाच वसाहतीत वस्तीला असतात. एकाच गंधमार्गाचा येता-जाता वापर करतात. परंतु, आपली स्वत:ची प्रजा मात्र दुसर्‍या जातीच्या संपर्कात अजिबात येऊ देत नाहीत. कॉम्पोनोट्स लॅटरॅलीस, क्रिमॅटोगॅस्टर स्कू टेलॅरिस या मुंग्यासुद्धा अशा शेजारधर्माचा अवलंब करतात.
एकंदरित पाहता, मुंग्या-मुंग्यांतील शेजारधर्म एकमेकांच्या वसाहतीत चोर्‍या करणे अथवा शेजारी असणार्‍या वसाहतीशी फटकून वागणे यात धन्यता मानतो. असा निष्कर्ष, निदान काही जातींच्या मुंग्यांबाबत काढावा लागतो. 

सप्तपर्णी वृक्ष

सप्तपर्णी  वृक्ष 

सप्तपर्णी  वृक्ष


सप्तपर्णी हा बंगालमधील वृक्ष आहे. त्याचे लाकूड अत्यंत हलके असते. त्यामुळेच तिथे शाळेत प्रथमच जाणार्‍या मुलांना लागणार्‍या पाट्या या लाकडापासून तयार करतात. वर्गांमधील फळेही याच लाकडापासून तयार होतात. त्यावरून या वृक्षाच्या इंग्रजी नावापुढे स्कॉलॅरिस असा शब्द आला. डॉ. हेमा साने 
प्पा बळवंत चौक ते कन्याशाळा' या रस्त्यावर चक्कर टाकली, तर दुतर्फा काही वृक्ष खडी ताजीम देत उभे असलेले दिसतात. कडुबदाम आणि सप्तपर्णी. कडुबदाम ओळखायचा त्याच्या फताड्या आणि गळून पडताना लालसर झालेल्या पानांमुळे. तसेच, बदामाच्या आकाराच्या आणि आकारमानात बदामापेक्षा किंचित मोठय़ा असलेल्या फळामुळे. हा बदाम अभारतीय, त्याच्या जोडीचा सप्तपर्णी मात्र खास भारतीय वृक्ष.
कन्याशाळेच्या दारातच असलेल्या सप्तपर्णीच्या शिरोभागी बाणाप्रमाणे फुटलेल्या दोन फांद्या अगदी अफलातून! लक्ष वेधून घेणार्‍या या फांद्यांवर या वृक्षाचं व्यवच्छेदक लक्षण स्पष्ट आहे. सप्तपर्णी म्हणजे प्रत्येक पेरावर सात पानांचं एक वलय. अनेकदा याच्या फांद्यांची मांडणीही वलयाकारच असते. अशावेळी सप्तपर्णीची एक अजस्त्र नैसर्गिक दीपमाळच तयार होते.
सप्तपर्णी ऊर्फ सातवीण पर्जन्यवनांचा सदाहरित वृत्तीचा रहिवासी. उंची एवढी, की खालच्या झाडीतून उभा राहिलेला हा वृक्ष जंगलावर नजर ठेवणारा, इतर वृक्षराजीचा संरक्षक पहारेकरीच. कारण, सर्व काही 'ऑल वेल' असेल, तर हा ३0 मीटरपर्यंत वाढणारा. पानं आणि फांद्यांच्या वलयांकित रचनेबरोबर सप्तपर्णीची आणखी एक खासियत म्हणजे फांद्यांवरची. विशेषत: फारशा जून न झालेल्या फांद्यांवरची पांढुरक्या श्‍वसन रंध्रांची रांगोळी. पर्णपातं साधं, आंब्याच्या पानासारखं दोन्ही टोकांना निमुळतं होणारं. पण, आकारमानात लहान. वरचा पृष्ठभाग मळकट हिरवा, तर खालचा पांढुरका. पोत जाडसर.
सप्तपर्णीला अगदी नगण्य आकारमानाच्या फुलांचे घोस येतात. नगण्य म्हणजे नखावर जवळजवळ दोन फुलं आरामात बसतील. पाच मळकट पांढर्‍या पाकळ्याच स्पष्टपणे दिसतात. फुलाचे इतर भाग केवळ जाणकारांनाच समजतात. पण, फुलांची संख्या अमाप. त्यांना वेखंडासारखा उग्र, झणझणीत गंध. डोकंदुखीवरचा उपाय. पण, अशी अनेक फुलं असंख्य झाडांवर बहरतात, तेव्हा हाच वास डोकेदुखीस कारणीभूत ठरतो. आयुर्वेदात एक वचन आहे -
योगादपि विषं तीक्ष्ण, उत्तमंमौषधम् भवेत । भैषजं काडपि दुयरुक्तं संभाव्यते विषम् । तेव्हा सप्तपर्णीचा गंधही असंच दुधारीशस्त्र आहे. अप्पा बळवंत चौकातून जाणार्‍या रस्त्यावरच्या रहिवाशांना अजून हा गंधानुभव नाही. कारण, हे वृक्ष अजून फुललेले नाहीत. या रस्त्याखेरीज इतरत्रही अनेक रस्त्यांवर सप्तपर्णीची लागवड आहे. तेव्हा काही वर्षांनी सार्वजनिक आणि सार्वत्रिक डोकेदुखी निश्‍चित.
सप्तपर्णी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान फुलतो. फुलांची जागा नंतर फळे घेतात. प्रत्येक फुलापासून सुतळीच्या जाडीच्या आणि त्याच रंगाच्या २ लोंबत्या शेंगा तयार होतात. लांबी जवळजवळ २५ सेंमीपर्यंत. या फळात असंख्य बिया तयार होतात. बिया अंदाजे ३-४ मिलिमीटर लांब तपकिरी वर्णाच्या. बियांच्या टोकाला असलेले केसांचे पुंजके, बियाच्या लांबीपेक्षा लांबीला जास्त. त्यामुळे सप्तपर्णीच्या बियांची वार्‍यावरची वरात अगदी सहज.
सप्तपर्णीचं वानसशास्त्रीय नाव अल्स्टोनिया स्कॉलॅरिस. अल्स्टोनिया हे प्रजाती दर्शक नाम म्हणजे 'अल्स्टोन' या वानस शास्त्रज्ञाच्या गौरवासाठी. 'स्कॉलॅरिस' या विशेषणाला खास छटा आहे.
सप्तपर्णी हा वृक्ष वंगभूमीचा खास वृक्ष. तिथे पूर्वी शिक्षणाचा 'श्रीगणेशा' होत असे लाकडी पाटीवर. आपल्याकडे दगडी पाटी वापरत होते, तशी ही लाकडी पाटी. त्यावर धूळ पसरायची आणि टोकदार काडीने अक्षरे काढायला शिकवले जाई. म्हणून ही धूळपाटी आणि अक्षरे धुळाक्षरे. या पाटीसाठी सप्तपर्णीचे लाकूड वापरले जात असे.
शाळेतले फळेही सप्तपर्णीच्या लाकडाचे. कारण, हे लाकूड वजनाला अतीव हलके. लाकडाचा असा वापर स्कूल म्हणजे शाळेसाठी. म्हणून अल्स्टोनिया झाला स्कॉलॅरिस. अल्स्टोनिया स्कॉलॅरिसचे शिक्षणाशी असलेले हे नाते आजही टिकून आहे. गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनच्या पदवीदान समारंभात प्रत्येक स्नातकाला सप्तपर्णीची शाखा दिली जातेच. पण, त्या पदवीपत्राच्या पार्श्‍वभूमीवर सप्तपर्णीच्या पानांसकटच्या फांदीची पार्श्‍वभूमी असते.